मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीत भाजपच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी सांगली व कोल्हापूर सारख्या शहरांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले
हिजाब वादावरून एआयएमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी म्हटले की, जर कोणताही व्यक्ती मुस्लिम महिलांना चुकीच्या हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल, तर ते त्याचा हात कापतील.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना थेट अजित पवारांनाच निर्वाणीचा इशारा दिला. अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे ते म्हणालेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी अजित पवारांना मनभेद किंवा मतभेद निर्माण होतील असे विधान टाळण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असले तरी, अनेक प्रभागांमध्ये आतापासूनच विजयाचा उत्सव सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील 70 जागी विरोधी उमेदवारांची माघार किंवा एकच उमेदवार रिंगणात उरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली
पुण्याचा त्रिकुट कारभार बदलण्याची गरज असून इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार विकासकामे, कारभार आणि नागरी सुविधांचा विचार करतात. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक पुण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सगळ्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची चौकशी निवडणूक आयोगाने लावली, तरी शिवसेनेने मात्र ठाण्यात बिनविरोधकांचे सेलिब्रेशन उरकून घेतले
पिंपरी चिंचवड मधील भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढायच्या नादात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्वतःच्याच माणसांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन स्थानिक भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे खाल्ले. अगदी कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खाल्ले, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप – प्रत्यारोपांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आणली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारची कळा!!, “पार्टी विथ अ डिफरन्स” कुठेच दिसेना!!, अशी अवस्था येऊन ठेपली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवरच दुगाण्या झोडल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी आपल्या सोयीचे राजकारण साधून घेतले.
महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे, पण अशा बंधुता परिषदांतून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
वेळीच वेसण घातली नाही म्हणून हिंमत झाली, असे म्हणायची वेळ अजित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली. अजित पवारांनी पिंपरी – चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आणि राज्य सहकारी बँक लुटली, असे आरोप त्याच अजित पवारांना टोचली भाजपची “राक्षसी भूक”!!, हे राजकीय सत्य आज पिंपरी चिंचवड मधून बाहेर आले.
बंधुतेच्या मार्गानेच समाजात समता प्रस्थापित करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याच बंधुतेच्या मूल्याची समाजाला गरज आहे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले राजकारण साधून घेतले. एकीकडे त्यांनी महापालिका निवडणुकांमधली बंडखोरी शमविण्यासाठी फोन केले, तर दुसरीकडे त्यांनी मराठी सक्तीचे भाषण केले. साताऱ्यातल्या 99 व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या भाषणाने गाजले.
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेचे 25 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले. कारण त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या सगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यासाठी मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण नुसते आरोप प्रत्यारोप करण्याखेरीज महाविकास आघाडीचे नेत्यांनी दुसरे केले तरी काय??, असा गंभीर सवाल या निमित्ताने समोर आला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या गोंधळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. “ज्यांना वेळेत उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, त्यांनी आपल्या नियोजनातील त्रुटी मान्य कराव्यात, बिनबुडाचे आरोप करू नयेत,” असा टोला नार्वेकर यांनी लगावला.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध केला असून, “राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती जनतेच्या हिताची कामे करतील का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुंबई महापालिकेचा किल्ला अर्थात निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष दाखवले जाईल. पण त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. ती वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. मलाही ऑफर्स आल्या होत्या, पण मी त्या पळवून लावल्या. तुम्हीही तसेच करा, असे ते म्हणालेत.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्याची तुलना प्रभू श्रीरामांच्या कार्याशी केल्याने राज्याच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू रामचंद्रांचे काम शोषित व पीडितांची सेवा करणे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे होते.
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जांची छाननी केली जात असून यात राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे. भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींच्या बाबतीत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने आपली पकड घट्ट केली असून, यामध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर भाजपच्या खात्यात आता 12 व्या बिनविरोध उमेदवाराची भर पडली असून, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदारसंघाच्या प्रभाग 6 ‘ब’ मधून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या वाढत्या आकड्यामुळे निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे ‘दिवंगत आमदार लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप शक्तिस्थळ’चे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या 61 व्या वर्षी रक्तदान करून 2026 या वर्षाची सुरुवात केली.
गुंडांच्या घरात अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी पण सचिन खरात वर ढकलली जबाबदारी!!, असला प्रकार पुण्यातून आज समोर आला. Ajit Pawar
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App