नाशिक : 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप सोबत महायुती मधून लढवून देखील भाजपला सोडून शरद पवारांबरोबर जाताना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विचारले नाही. त्यांनी तो निर्णय स्वतंत्रपणे स्वतःच घेतला. पण आता राज ठाकरे यांच्या बरोबर जाण्यासाठी दोन्हीकडून अनुकूल वातावरण असताना उद्धव ठाकरे तोंडी एक बोलून प्रत्यक्ष निर्णय घेण्यास मात्र विलंब लावत आहेत. इतकेच काय, पण भाजप सोडून पवारांबरोबर जातानाचा निर्णय स्वतः घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी भावाबरोबर जायचे की नाही, याचा निर्णय मात्र ते शिवसैनिकांना विचारायचा निर्णय घेतला. Uddav Thackrey
षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनात काल उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या मनात असेल तेच मी करेन, असे सांगितले होते. त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर युती करायला जाहीरपणे अनुकूलता दर्शविली होती. त्याबरोबर तिथे शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला होता. पण आज मात्र शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी शिवसैनिकांना स्थानिक पातळीवर मनसे बरोबर युती करायची का नाही?, याची व्यवस्थित माहिती घ्या आणि त्याचा अहवाल महिनाभरात द्या, असे आदेश दिले.
मनसे बरोबर युतीचा निर्णय लांबणीवर
याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी मनसे बरोबरच्या युतीचा विषय शिवसैनिकांवर सोपविल्याचे दाखवून प्रत्यक्षात तो किमान महिनाभर तरी लांबणीवर टाकला. वास्तविक शिवसैनिक आणि मनसैनिक हे आता दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणासाठी उत्सुक झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी त्यांनी एकत्रित आंदोलने किंवा कार्यक्रम देखील केले. यातून दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे “संदेश” दिले, पण उद्धव ठाकरेंना मात्र यातला नेमका संदेश समजूनही “उमजला” नाही किंवा तो त्यांना “समजून” घ्यायचा नाही, असे त्यांच्या नव्या आदेशावरून दिसून आले.
उद्धव ठाकरेंची मनमर्जी
वास्तविक शिवसेनेची सूत्रे हातात घेतल्यापासून उद्धव ठाकरेंनी नेहमी स्वतःचीच मनमर्जी चालविली. शिवसेना पक्ष अनेकदा फुटला. त्यातून अनेक महत्त्वाचे नेते बाहेर पडले,ं तरी उद्धव ठाकरेंनी त्यांचे कधी ऐकले नाही. त्यांनी शिवसेना नावाची संघटना फुटू दिली, ती कमकुवत होऊ दिली. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान पातळ केले. पण उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतल्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांचे किंवा समाजाची स्पंदने जाणणाऱ्या तरुण नेत्यांचे ऐकले नाही. त्यांना शिवसेनेतल्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत कधी सामील करून घेतले नाही.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नेमका हाच मुद्दा काढून उद्धव ठाकरेंना टोचले. शरद पवारांबरोबर जाताना शिवसैनिकांना विचारले होते का?, मग मनसे बरोबर येताना शिवसैनिकांना का विचारावे लागते?, असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी केला. संदीप देशपांडे यांच्या सवालाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कुणी उत्तर दिले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App