आंध्र प्रदेशात पुरामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, राहुल गांधींनी व्यक्त केला शोक, काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सदस्यासह 25 जणांचा मृत्यू झाला, तर 17 लोक अद्याप बेपत्ता आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या आपत्तीच्या वेळी शोक व्यक्त केला आहे. Rahul Gandhi appeles To Congress workers To help in all ways possible in Flood affected Andhra Pradesh


वृत्तसंस्था

हैदराबाद : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या सदस्यासह 25 जणांचा मृत्यू झाला, तर 17 लोक अद्याप बेपत्ता आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या आपत्तीच्या वेळी शोक व्यक्त केला आहे.

आंध्र प्रदेशात पुरामुळे मोठे नुकसान झाल्याचे राहुल यांनी ट्विटद्वारे लिहिले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. यावेळी राहुल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले, प्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कृपया शक्य ती सर्व मदत करा.

भारतीय हवाई दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अनंतपुरमु, कुड्डापाह आणि चित्तूर जिल्ह्यांतील भीषण पुरातून एका पोलीस निरीक्षकासह किमान ६४ लोकांना वाचवले आहे, असे राज्य सरकारने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 टीम रायलसीमा क्षेत्रातील तीन पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच दक्षिण किनारपट्टी आंध्रमधील एसपीएस नेल्लोरमध्ये बचाव आणि मदत कार्यात व्यस्त आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केली हवाई पाहणी

मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कुड्डापाह, अनंतपुरमु आणि चित्तूर जिल्ह्यांतील नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी हवाई सर्वेक्षण केले. त्यांनी कडप्पा आणि चित्तूरच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांशी बोलून नुकसानीची माहिती घेतली. पुराचे पाणी ओसरताच पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यास मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. पुरात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाइकाला सरकारने 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

पुरात वस्त्या बुडाल्या, दिलासा नाही

शनिवारी पावसाचा जोर थोडा कमी झाला, मात्र अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वस्त्या पाण्यात बुडाल्याने लोकांना फारसा दिलासा मिळाला नाही. तिरुपती शहरातील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. शहरातील अनेक भागांत पाणी तुंबले आहे. पावसामुळे यात्रेकरूंची गैरसोय झाली असली तरी तिरुमला टेकड्यांवर परिस्थिती काहीशी चांगली आहे.

तिरुपती देवस्थानसाठी रस्ते खुले

तिरुमला तिरुपती देवस्थानमने मुख्य रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला, तरीही टेकड्यांकडे जाणाऱ्या दोन पायऱ्या यात्रेकरूंसाठी बंद राहिल्या. ऑनलाईन तिकीट बुक केलेल्या भाविकांना भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या कडप्पाच्या राजमपेट मतदारसंघातील अनेक गावांमध्ये महापुराच्या खुणा दिसत आहेत. चेयेरू नदीच्या काठावरील तीन गावांतील 30 हून अधिक लोक वाहून गेले. कडप्पामध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Rahul Gandhi appeles To Congress workers To help in all ways possible in Flood affected Andhra Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात