पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा हात असल्याचा माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचा आरोप


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर – राहुरीचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येमध्ये ठाकरे – पवार सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. journalist rohidas tanpure murder case; shivaji kardile accused prjakt tanpure of conspiracy

रोहिदास दातीर ज्या भूखंडाच्या आरक्षणाच्या प्रकरणावरून तपास आणि चौकशी सुरू केली होती. यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे, त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. कर्डिले यांच्या या आरोपांमुळे ठाकरे – पवार सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणी आला आहे.

सहा एप्रिलला राहुरीत पत्रकार दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राहुरीचे माजी आमदार कर्डिले यासंबंधी शनिवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत.



 

कर्डिले म्हणाले, की पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी रोहिदास दातीर हे सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा समजले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे.

मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रॅन्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही. १८ एकरची मालमत्ता लाटण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

‘राहुरीत तनपुरे कुटुंबाची ही पद्धत आहे. एखादी मालमत्ता बळकवायची असेल तर तेथे आधी आरक्षण टाकतात, सौदा करतात आणि नंतर आरक्षण उठवून आणतात. त्यामुळे या प्रकरणात १८ एकरशी संबंधित जे जे कोणी सहभागी असतील त्यांच्याविरुद्ध संगनमताने दातीर यांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. ही मागणी करण्यासाठी आम्ही पोलिस अधीक्षकांकडे आलो आहोत. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती आम्ही पोलिसांना पुरवायला तयार आहोत. दातीर यांच्या पत्नीच्या जीवालाही धोका आहे. आम्ही त्यांना भेटून आलो. त्यावेळी त्यांनी बंदोबस्त देण्याची मागणी केली.

मी आमदार असल्याच्या काळात या मतदारसंघात अशा घटना झाल्या नाहीत. अलीकडे अशा चार घटना घडल्या आहेत. दातीर यांची हत्या झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. कारण त्यांना भीती आहे की भेटायला गेलो तर दातीर यांची पत्नी आपल्यावरच आरोप करेल. त्यामुळे पोलिसांनी दातीर यांच्या खूनाचा बारकाईने तपास करून खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचावे, असे आवाहन शिवाजी कर्डिले यांनी केले आहे.

journalist rohidas tanpure murder case; shivaji kardile accused prjakt tanpure of conspiracy

हे ही वाचा

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात