विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आज आहे. संपूर्ण देशवासीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. परंपरेनुसार मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा, असं आवाहन करताना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे,75th Independence Day: Speech of Chief Minister Thackeray after flag hoisting at the Ministry
तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझं वंदन, महापुरुषांनी स्वराज म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितला.
मला अभिमान आहे, महाराष्ट्रातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं मिळाली. कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल.
https://t.co/WOWAy8nAdU — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2021
https://t.co/WOWAy8nAdU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App