विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका “मॅच फिक्सिंग” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.Fadnavis
राहुल गांधींचे आरोप काय आहेत?
राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुकीच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितले गेले की एकूण मतदान 66.05 टक्के झाले. म्हणजेच रातोरात मतदानात 7.83 टक्के वाढ झाली.
त्यांनी असा दावा केला की, ही वाढ फक्त 12,000 मतदान केंद्रांवर झाली आणि त्यातल्या 85 टक्के ठिकाणी भाजपला विजय मिळाला. त्यामुळे निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, अशाच प्रकारची घडामोड लवकरच बिहारमध्येही होणार आहे. भाजप जिथे हरतं, तिथे अशी शक्कल लढवून विजय मिळवते, असा त्यांचा आरोप आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर – “हे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या लेखाला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या शेवटच्या तासात मतदान वाढणे ही काही विशेष गोष्ट नाही.
काही उदाहरणं देत फडणवीस म्हणाले:
कामठी : शेवटच्या तासात मतदान वाढलं आणि एनडीएने विजय मिळवला. माढा : शेवटच्या तासात 18% मतदान झाले, पण तिथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला. वणी : 13% शेवटच्या तासात मतदान झाले, आणि तिथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला. श्रीरामपूर : 12% मतदान वाढले, पण तिथे काँग्रेसनेच विजय मिळवला.
यावरून हे स्पष्ट होते की मतदान वाढल्यामुळे भाजपलाच फायदा झाला, असे नाही.
“लोकशाही प्रक्रियेचा अपमान करू नका” – फडणवीसांचा इशारा
फडणवीस पुढे म्हणाले की, राहुल गांधी सतत लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि जनतेच्या निर्णयावर संशय घेतात. हे अत्यंत दुर्दैवी असून देशात चुकीचा संदेश जात आहे.
त्यांनी म्हटले:
“राहुल गांधींना जनता पुन्हा पुन्हा नाकारते, त्यामुळे ते लोकांच्या निर्णयालाच अवैध ठरवत आहेत.”
त्यांनी काँग्रेसमध्येच काही नेते असं का बोलतात की “आमदारांना भेटायलाही वेळ मिळत नाही”? यावरही राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावे, असं फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयोगाची नियुक्ती – काँग्रेस विरुद्ध मोदी सरकार
फडणवीस यांनी सांगितले की, काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त थेट सरकारकडून नियुक्त होत होते. एकूण 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने नियुक्त केले.
मोदी सरकारने मात्र पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला सोबत घेऊन निवडणूक आयोगासाठी समिती स्थापन केली. त्यामुळे पारदर्शकतेसाठी सरकारने पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले.
मतदारसंख्या वाढीविषयी तथ्य
राहुल गांधींनी मतदार अचानक वाढल्याचा उल्लेख केला होता. यावर फडणवीसांनी म्हणाले की:
2004 ते 2009 दरम्यान 1 कोटी मतदार वाढले होते (मनमोहनसिंग सरकार). 2014 ते 2019 दरम्यान 63 लाख मतदार वाढले. 2019 ते 2024 मध्ये 75 लाख मतदार वाढले.
म्हणून 2024 मध्ये मतदारसंख्येत वाढ झाली, यात काहीही असामान्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही” – फडणवीस
फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी चुकीची माहिती पसरवत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला पाठिंबा दिला, पण राहुल गांधी त्यांचा निर्णयच अमान्य करत आहेत.
ते म्हणाले: “माझ्या राज्याच्या शेतकऱ्यांचा, महिला भगिनींचा आणि सामान्य जनतेचा अपमान कोणी केला, तर मी मुख्यमंत्री म्हणून त्याचा नेहमी निषेध करेन.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App