Power Crisis In Punjab : पंजाबात वीज संकट गडद, आंदोलन करणारे आप खा. भगवंत मान आणि आ. हरपाल चिमा पोलिसांच्या ताब्यात

AAP MP Bhagwant Man Detained After Protest Outside CM Amrindar Farmhouse Against Power Crisis In Punjab

 Power Crisis In Punjab : पंजाबमध्ये वीज संकट गडद झाले आहे. वीज संकटाच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाने शनिवारी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या फार्महाऊसला घेराव घातला. या वेळी तेथे तैनात असलेल्या पोलिस दलाने आपचे खासदार भगवंत मान आणि आमदार हरपालसिंग चीमा यांना ताब्यात घेतले. आपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करण्यात आला. पोलीस असूनही आंदोलकांनी तिथे लावलेले बॅरिकेड्स तोडले. आपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार भगवंत मान यांनी असा आरोप केला आहे की, पंजाबमधील जनता निषेध करत आहे आणि घरी बसून एक व्यक्ती आनंद घेत आहे. AAP MP Bhagwant Man Detained After Protest Outside CM Amrindar Farmhouse Against Power Crisis In Punjab


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबमध्ये वीज संकट गडद झाले आहे. वीज संकटाच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाने शनिवारी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या फार्महाऊसला घेराव घातला. या वेळी तेथे तैनात असलेल्या पोलिस दलाने आपचे खासदार भगवंत मान आणि आमदार हरपालसिंग चीमा यांना ताब्यात घेतले. आपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करण्यात आला. पोलीस असूनही आंदोलकांनी तिथे लावलेले बॅरिकेड्स तोडले. आपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार भगवंत मान यांनी असा आरोप केला आहे की, पंजाबमधील जनता निषेध करत आहे आणि घरी बसून एक व्यक्ती आनंद घेत आहे.

जनता रस्त्यावर, मुख्यमंत्री घरात

भगवंत मनाल म्हणाले की, पंजाबमधील जनता निषेध करत असताना घरी बसून एकच व्यक्ती आनंद घेत आहे. आम्ही किती तास वीजपुरवठा आहे हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसचे मीटर तपासण्यासाठी आलो आहोत. मान यांनी आरोप केला की, अकाली दल आणि भाजप सरकारच्या काळात लागू झालेला पंजाबविरोधी वीज करार आणि माफिया राज कॅप्टनच्या सत्ताकाळातही सुरू आहे. वीजमंत्री असल्याने मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या वीज संकटाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भगवंत मान यांनी वीज संकटावरील सुखबीर बादल यांच्या आंदोलनाला नाटक म्हटले आणि अकाली दल आणि भाजप सरकारने खासगी वीज कंपन्यांशी चुकीचे करार केल्याचे म्हटले. अकाली सरकारच्या काळात कोणाच्या नावावर किती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असे सवाल त्यांनी माजी मंत्री बिक्रमसिंह मजीठिया यांना उद्देशून विचारले.

वीज तोडल्यामुळे आर्थिक नुकसानीस कॅप्टन जबाबदार : भाजप

अघोषित वीज कपातीमुळे आणि सर्वसामान्यांच्या वाढत जाणाऱ्या अडचणींमुळे उद्योगांना होणाऱ्या नुकसानीसाठी पंजाब भाजपने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जबाबदार धरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा म्हणाले की, राज्यातील जनतेने मोफत वीज नाही, तर 24 तास वीज मागितली आहे.

राज्यातील वीज वितरण प्रणाली 13000 मेगावॅटपेक्षा जास्त भार हाताळू शकत नाही. तो वाढवण्यासाठी कॅप्टन यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. कॅप्टन यांच्या अपयशाचा पुरावादेखील पंजाबमधील सर्व सरकारी विभागांचे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर निदर्शने करत आहेत, यावरून स्पष्ट होते. विजेची बिले देऊनही लोकांना वीज मिळत नसताना जनतेचा संताप न्याय्य आहे. सर्व जिल्ह्यांत केवळ 10 ते 12 तास वीजपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते.

AAP MP Bhagwant Man Detained After Protest Outside CM Amrindar Farmhouse Against Power Crisis In Punjab

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात