वृत्तसंस्था
भुवनेश्वर : Odisha ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यात मुलींची छेड काढल्याच्या आरोपावरून जमावाने मारहाण करून जीआरपी कॉन्स्टेबल सौम्य रंजन स्वाईं यांची हत्या केली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा सौम्य रंजन आपल्या सहकाऱ्यासोबत एका अधिकृत कामासाठी रेल्वे एडीजींना भेटायला जात होते.Odisha
आरोप आहे की सौम्य रंजन आणि ओम प्रकाश यांनी बुधवारी वाटेत दोन तरुणींवर अश्लील टिप्पणी केली. त्यांच्या बाईकने स्कूटीवर असलेल्या दोन महिलांना धडकही दिली, त्यामुळे महिला दूरपर्यंत फरफटत गेल्या. सौम्य रंजन गेल्या 12 वर्षांपासून कटक जीआरपीमध्ये कॉन्स्टेबल होता.Odisha
सौम्य रंजनच्या आईने सांगितले की, त्यांचा मुलगा आपला सहकारी ओम प्रकाशसोबत एडीजींना भेटायला जात होता, पण लोकांनी त्याला मारहाण करून ठार केले. कुटुंबाचा आरोप आहे की, पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते, पण त्यांनी सौम्यला वाचवण्यासाठी कोणतीही पाऊले उचलली नाहीत.
कुटुंबाचा आरोप- पोलिसांनी काहीच केले नाही
घटनेची बातमी परिसरात पसरताच मोठ्या संख्येने लोक जमा झाले. संतप्त जमावाने दोघांना थांबवले आणि सौम्य रंजनवर हल्ला केला.
पोलिसांनी मृताला मदत न केल्याच्या आरोपावर डीसीपी जगमोहन मीणा म्हणाले की, प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यांनी सांगितले की, दुसऱ्या बाजूनेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात मृत व्यक्तीच्या बाजूवर दोन तरुणींवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App