विशेष प्रतिनिधी
दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक बातमी दिली आहे. या बातमीनुसार भारतातील तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी मागील 5 वर्षांमध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे.
In the last five years, more than 6 lakh people have renounced their Indian citizenship
राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये 1 लाख 33 हजार भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला आहे तर 2018 मध्ये हाच आकडा 1 लाख 34 हजार इतका आहे. 2019 मध्ये हा आकडा वाढून 1 लाख 44 इथे पोहोचला. तर 2020 मध्ये हा आकडा 85 हजार 247 पर्यंत पोहोचला. तर 2021 मध्ये निर्बंध हटवण्यात आल्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या नागरिकांचा आकडा 1 लाख 11 हजार इतका झाला आहे.
Indian Railways : तुमच्याकडे तिकीट नसेल तरी आता नो टेन्शन ; काय आहे खास नियम
सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा च्या नियमावलीनुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश या मुस्लीम बहुसंख्य देशांतील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन यांनादेखील भारतीय नागरिकत्वासाठी आता अर्ज करतात येणार आहे. एकीकडे नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांची संख्या लाखांमध्ये असली तरी भारतीयत्वाचा स्वीकार केला नागरिकांची आकडेवारीदेखील मोठी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App