वृत्तसंस्था
अहमदाबाद : सशस्त्र दलांवरील खर्चाला अर्थव्यवस्थेवर ओझे म्हणून पाहू नका. त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे, असे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले. Expenditure on the armed forces Don’t look at it as a burden on the economy लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी गुजरातमधील एका भाषणात सांगितले की, ” सशस्त्र दलावरील खर्चाकडे गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. ही अशी गुंतवणूक आहे ज्याचा पूर्ण परतावा आहे.” ते पुढे म्हणाले, ” सशस्त्र दले अर्थव्यवस्थेवर भार नाहीत. देशाच्या प्रगतीसाठी शांततापूर्ण वातावरण आवश्यक आहे. त्या दृष्टीने जनतेने वागणे आवश्यक आहे.
शांततेच्या काळात युद्धाची तयारी केली तर कोणतही युद्ध सहज जिंकता येते, असे सांगितले जाते. त्या पार्श्वभमीवर सशस्त्र दलांवर होणारा खर्च हा अर्थव्यवस्थेवरील बोजा नसून ती एक सर्वोतकृष्ट गुंतवणूक असून ऐन युध्दाच्या धामधुमीत आणि देशाच्या संरक्षणावेळी पूर्ण परतावा देणारी असते, असे नरवणे यांचे मत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App