Rahul Gandhi : राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र! जाणून घ्या, काय म्हणाले?

Rahul Gandhi

राहुल गांधींनी नुकतीच पूंछ येथे जाऊन पाकिस्तानच्या गोळीबारामुळे पीडित झालेल्या नागरिकांची भेट घेतली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Rahul Gandhi  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे पूंछ आणि पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या जम्मू-काश्मीरच्या इतर सर्व भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेज देण्याची मागणी केली आहे.Rahul Gandhi

गेल्या शनिवारी राहुल गांधींनी जम्मू-काश्मीरमधील पूंछला भेट दिली आणि बाधित लोकांसोबत वेळ घालवला. यामध्ये ७ मे ते १० मे दरम्यान सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्यात आपले स्वकीय गमावलेल्या कुटुंबांचा समावेश होता. राहुल गांधींनी गुरुद्वारा सिंह सभा, मंदिर गीता भवन आणि मदरसा झिया-उल-उलूमलाही भेट दिली आणि क्राइस्ट हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.



पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी अलीकडेच पूंछला भेट दिली होती, जिथे पाकिस्तानच्या गोळीबारात ४ मुलांसह १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. पत्रात राहुल गांधींनी म्हटले आहे की, पाकिस्तानी गोळीबारामुळे सर्वसामान्यांच्या भागांचे नुकसान झाले आहे. शेकडो घरे, दुकाने, शाळा आणि धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक पीडितांनी सांगितले की त्यांचे वर्षानुवर्षे केलेले कष्ट एकाच झटक्यात उद्ध्वस्त झाले.

पूंछ आणि सीमेवरील इतर भागातील लोक दशकांपासून शांततेत आणि बंधुत्वात राहत आहेत. आज जेव्हा ते या गंभीर संकटातून जात आहेत, तेव्हा त्यांचे दुःख समजून घेणे आणि त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी भारत सरकारला पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या इतर सर्व भागांसाठी पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची विनंती करतो.

पूंछला गेल्यानंतर राहुल गांधी यांनी हे सांगितले

पुंछ भेटीचा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “पुंछची वेदना तिथे जाऊनच जाणवते. तुटलेली घरे, विस्कळीत जीवन – या वेदनेतूनही एकच आवाज येतो – आपण भारतीय एक आहोत.” गांधींनी ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी विनंती करत नाही, तर सरकारला त्यांची जबाबदारी आठवून देतोय – पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या इतर भागांसाठी एक ठोस, उदार आणि तात्काळ मदत आणि पुनर्वसन पॅकेज तयार केले पाहिजे. ही मदत नाही, तर कर्तव्य आहे.”

Rahul Gandhi wrote a letter to Prime Minister Modi Find out what he said

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात