वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाची खुमखुमी चीनला आली आहे. सीमांचे विस्तारवादी धोरण आणि कुरापती काढण्यात अग्रेसर असणाऱ्या चीनने पाकिस्तानात सुरु असलेल्या इस्लामिक परिषदेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे. त्यावरून भारताने तुमचा याच्याशी काही एक संबध नसल्याचे सांगून फटकारले आहे. India lashes out at China over Kashmir; Pak-China plot to build third front of Islamic nations
जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या उलट पाकिस्तानने काश्मीरचा भाग आणि चीनने अकसाई चीन हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. असे असताना इस्लामिक देशांच्या परिषदेत चीनने अकारण काश्मीर राग आळविला आहे.
रशिया युक्रेन युद्धात अमेरिका समर्थक राष्ट्र आणि रशिया समर्थक राष्ट्र असे दोन गट निर्माण झाले असताना पाकिस्तान, चीन हे देश जागतिक पातळीवर इस्लामिक राष्ट्रांना समवेत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा दिशेने पावले टाकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान, केंद्र शासित जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्यात चीनने लुडबुड करण्याची गरज नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ठणकावले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App