महाराष्ट्रातली राज्यसभा पोटनिवडणूक होणार बिनविरोध; भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय घेणार माघार


प्रतिनिधी

मुंबई – राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती.Rajya Sabha by-elections in Maharashtra to be held unopposed; BJP candidate Sanjay Upadhyay will withdraw

मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती.



या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेत निवडणूक विबनविरोध व्हावी, यासंदर्भात विनंती केली होती.

तर, विनंतीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर आज संजय उपाध्याय उमेदवारी अर्ज मागे घेतील, असं जाहीर करण्यात आलंय. आज दुपारी ते विधीमंडळात जाऊन अर्ज माघारी घेणार आहेत.

मी भाजपचा शिस्तबध्द कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिल्यानुसार मी राज्यसभा निवडणूकीतला अर्ज माघारी घेत आहे, असे संजय उपाध्याय यांनी पत्रकारांना सांगितले.

Rajya Sabha by-elections in Maharashtra to be held unopposed; BJP candidate Sanjay Upadhyay will withdraw

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात