
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने दुसऱयांदा समन्स पाठवले आहे. 28 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील यामध्ये दिले आहेत.
kirit somaiya has tweeted anil parab should attain ED’s Investigation call this time
ऑगस्टमध्ये ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण काही कारणाने ते हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर ईडीने 30 ऑगस्ट रोजी तीन ठिकाणी छापे मारले होते. यामध्ये परब यांचे निकटवर्ती मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे आणि वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांचा समावेश होता. खरमाटे आणि पाटील या दोघांची आठ तास कसून चौकशी ईडीने केली होती. त्यानंतर आता परब यांची चौकशी राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे असे इडीचे म्हणणे आहे.
अनिल परबांना ईडीची जरब, नव्याने देणार तारीख
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत, ‘आता तरी परब चौकशीसाठी हजर राहतील’ असे म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते.
सोमय्यांना माहिती कुणी पुरवली? यावरून शिवसैनिकांमध्ये जुंपली :
पण दरम्यानच्या काळात अनिल परब यांच्या घोटाळ्यांविषयी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना नेमकी माहिती कोणी पुरवली? यावरून दोन शिवसैनिकांमध्येच भांडण जुंपले आहे. शिवसैनिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी अनिल परब यांच्या घोटाळ्यांविषयी माहिती पुरविल्याचा आरोप कोकणातील खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेत बरीच खळबळ माजली आहे.
kirit somaiya has tweeted anil parab should attain ED’s Investigation call this time
महत्त्वाच्या बातम्या
- १२००० कोटी विरूद्ध १.३४,४९९ कोटी; माजी कृषिमंत्र्यांना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी दाखविला कृषी बजेटचा “आरसा”
- जाणून घ्या देशात पहिल्या आलेल्या युपीएससी टॉपर शुभम कुमार ची कहाणी
- सहकार क्षेत्रात पारदर्शकतेला महत्त्व द्या; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचे पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात परखड बोल
- जम्मू -काश्मीरवर घोंगावतेय तालिबानचे हिरवे संकट; सैन्याच्या तुकड्या वाढविण्याबरोबरच पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेण्याची गरज
- कोरोना लसीकरणात गोव्याने रचला विक्रम, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा, राज्यातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 50 टक्के लसीकरण पूर्ण