आघाडीत बिघाडी : नाना पटोले म्हणाले – महाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही, फक्त ५ वर्षांसाठी !

Congress State President Nana Patole Says MVA For 5 years Only Not Permanent

Nana Patole Says MVA For 5 years Only : महाराष्ट्रात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात पाच वर्षांसाठीच शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, ही आघाडी कायमस्वरूपी नाही. Congress State President Nana Patole Says MVA For 5 years Only Not Permanent


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात पाच वर्षांसाठीच शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, ही आघाडी कायमस्वरूपी नाही.

लोक जोडे हाणतील

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात म्हटले होते की, विधानसभेत लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वबळाने निवडणूक लढविण्याची चर्चा करणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील. ठाकरे म्हणाले होते की, सर्व पक्षांनी आपल्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून अर्थव्यवस्था व आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ठाकरे कुणाबद्दल बोलले हे स्पष्ट नाही

ठाकरे नेमके कुणाबद्दल बोलले असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर पटोले म्हणाले की, याविषयीच स्पष्टीकरण नाही. ते म्हणाले की, भाजपसुद्धा स्वबळावर निवडणुका लढवण्याची चर्चा करत आहे. ते म्हणाले की, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (राष्ट्रवादी) आणि भाजप या चारही पक्षांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत.

महाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही

पटोले म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी आम्ही 2019 मध्ये महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार स्थापन केले. ही आघाडी कायमस्वरूपी नाही. प्रत्येक पक्षाला आपली संघटना बळकट करण्याचा अधिकार आहे आणि कोरोना काळात अनेक ठिकाणी रक्त, ऑक्सिजन आणि प्लाझ्मा पुरवून दिलासा देण्यास कॉंग्रेसने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पटोले म्हणाले की, ठाकरे यांनी शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर पक्षप्रमुख म्हणून उपरोक्त टिप्पणी केली होती.

शिवसेना आणि कॉंग्रेस अनेक दशकांपासून कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2019 मध्ये युती तुटल्यामुळे या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.

संजय राऊतांनी टोचले काँग्रेसचे कान

मात्र, शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या पक्षाने महाराष्ट्राच्या वैभवासाठी आणि पक्षाच्या बळासाठी सर्व लढाया नेहमीच एकहाती लढल्या आहेत.

ते म्हणाले की, शिवसेनेसाठी पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट आहे. बाकीचे नेते संभ्रमातून मुक्त झाले पाहिजेत, कारण एखाद्या पक्षाचा नेता एकट्याने लढा देण्याविषयी बोलतो, तर त्याच पक्षाचा दुसरा नेता म्हणतो की, ही आमच्या पक्षाची भूमिका नाही.

कॉंग्रेसचे नेते एच. के. पाटील यांच्या वक्तव्याचा संदर्भ राऊत असे म्हणाले. ते म्हणाले की, प्रदेश कॉंग्रेसने पक्षाला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि स्वबळावर निवडणूक लढवायची की नाही, हा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा आहे.

Congress State President Nana Patole Says MVA For 5 years Only Not Permanent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात