औरंगाबाद : रिक्षा चालकांना लसीकरण केले सक्तीचे ; चालकांनी किमान एक तरी डोस घ्यायला हवा


आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांना रिक्षा चालकांचे प्रमाणपत्र चेक करण्याचे आदेश देखील दिले आहेत. Aurangabad: Auto rickshaw drivers forced to be vaccinated; Drivers should take at least one dose


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : कोरोनावर मस्त करण्यासाठी औरंगाबाद मध्ये लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार औरंगाबाद पॅटर्न राबविण्यात आला होता. यामध्ये ज्यांनी लस घेतली नाही त्यांना रेशनिंग दुकान, गॅस एजन्सी आणि इतर सरकारी कार्यालयात प्रवेश नाकारला होता. दरम्यान आता आरटीओने देखील लसीकरण सक्तीचे केले आहे. लसीकरण झाले तरच औरंगाबादेत रिक्षा चालकांना रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात येणार आहे.



औरंगाबादमध्ये रिक्षा चालकांना लसीकरण सक्तीचे केले असून लसीकरणाचा किमान एक डोस घेतला असेल तरच रिक्षा शहरात चालवता येणार असा आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांना रिक्षा चालकांचे प्रमाणपत्र चेक करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

तसेच खाजगी वाहक, चालक, आणि ट्रॅव्हल कंपनी कर्मचारी यांचे दोन्ही डोस झालेले असावे तरच काम करता येणार आहे.
दरम्यान खाजगी बस मधून प्रवास करण्यासाठी सुदधा लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. प्रवाशांचा किमान एक डोस झाला असेल तरच ट्रॅव्हल एजेंट तिकीट विक्री करू शकणार आहेत.

Aurangabad : Auto rickshaw drivers forced to be vaccinated; Drivers should take at least one dose

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात