वृत्तसंस्था
मुंबई :अँग्री यंग मॅन अर्थात महानायक अमिताभ बच्चन आता ब्लॉगवरील कमेंटवरून व्यथित झाले असून त्यांनी ब्लॉग रायटिंगला रामराम ठोकण्याचा विचार सुरु केला. Amitabh Bachchan is Unhappy with comments of people’s on his blog
अमिताभ बच्चन यांनी बहारदार अभिनयातून रसिक अधिराज्य गाजविले आहे. चित्रपट आणि कौन बनेगा करोडपतीवरही लोकांनी अमाप प्रेम केलं. त्यामुळे त्यांनी ब्लॉग लिहिणंही सुरू केलं.
रोज अमिताभ बच्चन छोटा-मोठा ब्लॉग लिहित होते. पण आता ब्लॉगपासून ब्रेक घ्यावासा वाटू लागलं आहे. अमिताभ बच्चन यांनी नव्या ब्लॉगमध्ये ही बाब स्पष्ट केली. लिहिणं थांबवावं किंवा अदृश्य होऊन जावं असं वाटतं असं बच्चन म्हणतात.
बच्चन यांच्या या ब्लॉगल एक हजार कमेंट्स आल्या. गेल्या काही दिवसांपासून ब्लॉगवर येणाऱ्या कमेंटसनी ते व्यथित झाले होते. अगदी तुम्ही कधी मरणार, तुम्ही किती मदत देता आहात असे अनेक प्रश्न विचारले. त्यातून बच्चन यांना या प्रकाराचा उबग आला असावा असं बोललं जातं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App