माओवादी नक्षलवाद्यांच्या अंगात पाकिस्तानी माज, मोदी सरकारवर दुगाण्या झोडतच शांततेचा प्रस्ताव!!

Maoist naxalites and Pakistani

माओवादी नक्षलवाद्यांच्या अंगात पाकिस्तानी माज, मोदी सरकारवर दुगाण्या झोडतच शांततेचा प्रस्ताव!!, अशी भारतातल्या नक्षलवाद्यांची आणि पाकिस्तानी राज्य राज्यकर्त्यांची समान भावना झाली आहे, म्हणूनच या दोन्ही घटकांनी आपापली मस्ती कमी न करता केंद्रातल्या मोदी सरकारला शांतता आणि चर्चेचे प्रस्ताव दिले आहेत.

नक्षलवाद्यांचा प्रमुख नेता बसवराजू मारला गेल्यानंतर गडचिरोली आणि बस्तर परिसरातले माओवादी नक्षलवादी अक्षरशः “सरळ” झाले. सरकार कोणत्याही स्थितीत नक्षलवाद निपटून काढल्या खेरीज थांबणार नाही हे लक्षात आल्यानंतर आपले जीव वाचविण्यासाठी माओवादी नक्षलवाद्यांनी सरकारकडे शांततेचा प्रस्ताव पाठवला. पुढचा महिनाभर आम्ही कुठेही आणि कुठलाही गोळीबार करणार नाही. सरकारने आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, असे आवाहन माओवादी नक्षलवाद्यांनी सरकारला केले, पण हे आवाहन करताना माओवादी नक्षलवाद्यांनी मस्ती पूर्ण जिरल्याचे अजिबात निदर्शनास आणू दिले नाही. उलट त्यांनी त्या प्रस्तावात सरकारवरच टीकेच्या दुगाण्या झोडल्या. मोदी सरकारने पाकिस्तानचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव एका दिवसात मान्य केला, पण आम्ही पाठवलेला प्रस्ताव दोन महिने झाले, तरी मान्य केला नाही, असे शरसंधान माओवादी नक्षलवाद्यांनी सरकारवर साधले.

त्याच वेळी माओवादी नक्षलवाद्यांनी पुढची मस्ती त्याच पत्रकातच दाखवून दिली. आमचा नेता बसवराजू जरी मारला गेला असला, तरी आमचा लढा थांबणार नाही. बसवराजूच्या नेतृत्वाखाली तयार झालेले तरुण कॉम्रेड्स तो लढा पुढे चालूच ठेवतील, अशी दमदाटी माओवादी नक्षलवाद्यांनी त्या पत्रकात केली.



इथेच पाकिस्तानी राज्यकर्त्यांची आणि माओवादी नक्षलवाद्यांचे मस्ती समान ठरली.

पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव तेव्हाच ठेवला, ज्यावेळी operation sindoor मधून त्यांच्या अण्वस्त्रांना धक्का लागण्याची भीती निर्माण झाली. कारण भारताने पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन तिथली दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानचे 20 % हवाई दल उडवून टाकले. पाकिस्तानातले हवाई तळ उद्ध्वस्त केले. आपण शस्त्रसंधी केली नाही, तर भारत आणखी मोठे कारवाई करून पाकिस्तानचे फार मोठे नुकसान करेल. बड्या शक्तींनी पाकिस्तानात ठेवलेल्या अणवस्त्रांना धक्का लावेल ही भीती वाटल्याबरोबर पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पांढरा झेंडा फडकावला. अमेरिकेपुढे नाक घासून भारताला शस्त्रसंधी करायची विनंती केली, पण ही विनंती करताना पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आम्ही दहशतवाद थांबू किंवा दहशतवादाला पोसणे थांबवू असे अजिबात सांगितले नाही. उलट पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड जनरल असीम मुनीरला फील्ड मार्शली बहाल केली. तुर्कस्तान आणि इराण या देशांशी संबंधांचे झ्यांगट वाढवून भारताविरुद्ध मोर्चेबांधणी केली.

माओवादी नक्षलवाद्यांनी देखील शांततेची याचना करताना मोदी सरकारवरच दुगाण्या झाडल्या. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारताकडे सिंधू जल करारावरची स्थगिती उठवण्याची मागणी करताना अशीच दमबाजीची भाषा केली.

पण माओवादी नक्षलवादी असोत किंवा पाकिस्तानी राज्यकर्ते असोत, त्यांच्या कुठल्याही शांतता प्रस्तावांवर विश्वास ठेवायचा नाही. उलट या दोघांविरुद्ध अवलंबलेले आक्रमक धोरण अजिबात पातळ किंवा सौम्य करायचे नाही, हा धोरणात्मक निर्णय मोदी सरकारने घेतला म्हणूनच पाकिस्तानी राज्यकर्ते आणि माओवादी नक्षलवादी यांना शांततेसाठी नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. पण असल्या नाकदुऱ्यांना भुलायला भारतीय राज्यकर्ते दुधखुळे राहिलेले नाहीत.

Maoist naxalites and Pakistani rulers have same language and mentality over ceasefire

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात