ही निवडणूक म्हणजे विकसित भारत आणि विकसित बिहार या एकाच संकल्पाची निवडणूक आहे. असंही म्हणाले आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: आसाममधील नलबारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा दिवस रामनवमीचा आहे आणि हे ऐतिहासिक पर्व आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच मोदी म्हणाले की, एनडीएने देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 5 वर्षात आणखी 3 कोटी नवीन घरे बांधली जातील.In Assam Modi said another 3 crore new houses will be built in the next 5 years
या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमधील गया येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले होते. यावेळी ते म्हणाले होते की ही ती भूमी आहे जिने मगधची ऐश्वर्य पाहिली आहे, बिहारचे वैभव पाहिले आहे. योगायोगाने आज मी गयाला आलो तेव्हा नवरात्री आहे आणि आज सम्राट अशोकाची जयंतीही आहे. शतकांनंतर, आज पुन्हा एकदा भारत आणि बिहार त्यांचे प्राचीन वैभव परत करण्यासाठी पुढे जात आहेत.
याशिवाय ही निवडणूक म्हणजे विकसित भारत आणि विकसित बिहार या एकाच संकल्पाची निवडणूक आहे. गयाच्या भूमीवर जमलेली ही गर्दी, हा प्रचंड जनसमर्थन स्पष्टपणे सांगत आहे – पुन्हा एकदा मोदी सरकार. अवघ्या 2 दिवसांपूर्वी भाजपने आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App