विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) ने गुरुवारी निर्णय घेतला की ते देशातील १४ टेलिव्हिजन अँकरच्या कार्यक्रमांना त्यांचे प्रतिनिधी पाठवणार नाहीत. तर न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन (NDBDA) ने सांगितले की बहिष्काराचा हा निर्णय एक धोकादायक उदाहरण सिद्ध होईल. हे लोकशाहीच्या मूल्यांच्या विरोधात आहे. त्याचवेळी भाजपाने विरोधी आघाडीच्या या निर्णयाची तुलना इंदिरा गांधी सरकारच्या काळात लादलेल्या आणीबाणीशी केली आहे. I.N.D.I.A Aghadis decision to boycott the programs of 14 news anchors across the country BJP compares it to emergency
विरोधी पक्ष आघाडी ‘इंडिया’च्या मीडिया संबंधित समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विरोधी आघाडीच्या मीडिया कमिटीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘इंडिया’ समन्वय समितीच्या 13 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, विरोधी आघाडीचे पक्ष त्यांचे प्रतिनिधी या १४ अँकरच्या शो किंवा कार्यक्रमांना पाठवणार नाहीत. ”
एनबीडीएने म्हटले आहे की, “विरोधी आघाडीच्या मीडिया समितीच्या निर्णयाने एक धोकादायक उदाहरण ठेवले आहे. विरोधी आघाडीच्या प्रतिनिधींना भारतातील काही प्रमुख न्यूज अँकरकडून चालवल्या जाणार्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास बंदी घालणे लोकशाहीच्या आचारविचारांच्या विरुद्ध आहे.
काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख आणि विरोधी आघाडीच्या मीडिया कमिटीचे सदस्य पवन खेडा म्हणाले, “रोज संध्याकाळी ५ वाजल्यापासून काही वाहिन्यांवर द्वेषाची दुकाने उघडली जातात. द्वेषाच्या बाजाराचे आम्ही ग्राहक बनणार नाही. द्वेषमुक्त भारत हेच आमचे ध्येय आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App