दलालांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात धान्याची किंमत टाकू देण्यास तयार नव्हते. परंतु, केंद्र सरकारच्या दट्याने अखेर राज्य सरकार तयार झाले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. रब्बी हंगामात विकलेल्या धान्याचे २०२.६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.For the first time, farmers in Punjab got foodgrains directly in their bank accounts at a minimum guaranteed price of Rs 202.69 crore.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दलालांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात धान्याची किंमत टाकू देण्यास तयार नव्हते. परंतु, केंद्र सरकारच्या दट्याने अखेर राज्य सरकार तयार झाले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
रब्बी हंगामात विकलेल्या धान्याचे २०२.६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार किमान हमी भावाने धान्याची खरेदी किंमत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही इतर खर्चाशिवाय आपल्या कष्टाचे मोल मिळाले आहे. पंजाब सरकारने थेट बॅँक खात्यात (डीबीटी) शेतकऱ्यांचे पैसे टाकून देण्यास परवानगी द्यावी यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत हेते.
यंदाच्या वर्षी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने हे क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. अगदी वेळेत आपल्या पिकाचे पैसे मिळाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदाच्या हंगामात देशात १२१.७ लाख टन गव्हाचे उत्पादन झाले आहे. त्यातील ४४.८ लाख टन पंजाब आणि हरियाणातून तर २८.५ लाख टन मध्य प्रदेशातून खरेदी करण्यात आलाआहे. देशातील ११.६ लाख शेतकऱ्यांना थेट बॅँक खात्यात पैसे मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App