विशेष प्रतिनिधी
पुणे : देशाच्या अन्नपुरवठ्या मध्ये सर्वात मोठे योगदान असलेल्या आणि देशाच्या संरक्षणातही मोलाचं योगदान असणाऱ्या पंजाबमधील शेतकर्यांना दुखावून चालणार नाही, असे शरद पवार यांनी मोदी सरकारला सांगताना म्हटले आहे. पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना ते बोलत होते.
Don’t hurt the farmers of Punjab, the country has paid the price till the assassination of Indira Gandhi: Sharad Pawar
जेव्हा देशाच्या संरक्षणाचा विषय येतो, तेव्हा पंजाबमधील शेतकरी स्वत: लढायला तयार होतो. पंजाबमधील शेतकरी दुखावले तर त्याची किंमत काय आहे, हे आपण एकदा अनुभवले आहे. याची किंमत इंदिरा गांधी यांच्या हत्येने दिली आहे. त्यामुळे पंजाबमधील शेतकर्यांना दुखावू नका. असा इशारा शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.
Sharad Pawar for UPA chairman; नुसते “फिल” देणे – घेणे; नाशकातून राऊतांनी पवारांना यूपीए चेअरमन करणे!!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर वेळोवेळी भाष्य केले आहे. यावेळी देखील आपली भूमिका मांडताना ते म्हणतात की, पंजाबमधील शेतकर्यांना अस्वस्थ होऊ देऊ नये. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने लक्ष देत नाहीये. मागील एका वर्षांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत. पण सरकार मात्र ह्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येतेय. असे चालणार नाही.’
‘पंजाब हे सीमा रेषेवरील एक राज्य आहे. पंजाबची सीमा ही पाकिस्तानला जोडून आहे. त्यामुळे देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णता असणाऱ्या या राज्यातील काही प्रश्नांसाठी जर शेतकरी आग्रहाने आंदोलना बसला असेल तर राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ही राष्ट्राची गरज आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App