वृत्तसंस्था
नवी दिल्ली : CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला तात्पुरता विलंब दिला आहे. सुरुवातीला २९ मेपासून सुरू होणारे ऑनलाइन पोर्टल आता १ जून २०२६ रोजी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा बोर्डाने केली आहे.CBSE
सीबीएसईच्या नव्या ‘ऑन स्क्रीन मार्किंग’ प्रणालीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी तांत्रिक अडचणींच्या तक्रारी केल्या होत्या. पोर्टल लॉगिन न होणे, पेमेंट फेल होणे, शुल्क दोनदा कापले जाणे, उत्तरपत्रिका डाउनलोड न होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणात समोर आल्या.CBSE
या वाढत्या तक्रारीनंतर बोर्डाने पोर्टल अधिक सक्षम करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणातील अर्ज हाताळण्यासाठी अतिरिक्त तांत्रिक सुधारणा सुरू केल्याचे सांगितले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनीही या प्रकरणाची दखल घेत, त्रुटी दूर करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आयआयटी तज्ज्ञांची मदत घेऊन पोर्टल स्थिर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सीबीएसईकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतींसाठी अर्ज केले होते. एकूण ११ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची मागणी करण्यात आली होती.
पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क किती? गुण पडताळणी : प्रति विषय १०० रुपये पुनर्मूल्यांकन : प्रति प्रश्न २५ रुपये
विद्यार्थ्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची प्रत घ्यावी लागेल. त्यानंतरच गुण पडताळणी किंवा विशिष्ट प्रश्नांचे पुनर्मूल्यांकन करता येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
सोशल मीडियावर आणि विविध विद्यार्थी मंचांवर सीबीएसईविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि महाविद्यालयीन कट-ऑफवर या विलंबाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. काही पालकांनी तर “राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा व्यवस्थापनात गंभीर निष्काळजीपणा” झाल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, सीबीएसईने विद्यार्थ्यांना घाबरून न जाता अधिकृत पोर्टलवरच माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. बोर्डाने हेल्पलाइन आणि तक्रार निवारण यंत्रणाही सक्रिय केल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App