वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Mallikarjun Kharge काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे पुत्र प्रियांक खरगे यांच्याविरोधात भाजपने गंभीर आरोप केले आहेत. कर्नाटकमधील औद्योगिक क्षेत्रातील तब्बल 100 कोटी रुपयांच्या जमिनीच्या वाटपावरून हा नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी खरगे कुटुंबीयांशी संबंधित ट्रस्टला नियमबाह्य पद्धतीने मौल्यवान जमीन देण्यात आल्याचा आरोप केला आहे.Mallikarjun Kharge
नेमका काय आहे आरोप?
भाजपच्या दाव्यानुसार, 2024 मध्ये कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड (KIADB) ने ‘सिद्धार्थ विहार ट्रस्ट’ला पाच एकर औद्योगिक जमीन मंजूर केली. ही जमीन एरोसगगगगगग्पेस आणि डिफेन्स क्षेत्रातील संशोधन व विकास (R&D) प्रकल्पासाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.Mallikarjun Kharge
मात्र भाजपचा आरोप आहे की, संबंधित ट्रस्टचा एरोस्पेस किंवा संरक्षण संशोधन क्षेत्राशी कोणताही पूर्वानुभव किंवा कामकाजाचा इतिहास नव्हता. तरीही या ट्रस्टला अत्यंत मौल्यवान औद्योगिक जमीन देण्यात आली. सध्याच्या बाजारमूल्यानुसार या जमिनीची किंमत सुमारे 100 कोटी रुपये असल्याचा दावा भाजपने केला आहे.
‘सत्तेचा प्रभाव वापरला गेला’
प्रदीप भंडारी यांनी आरोप केला की, खरगे कुटुंबीयांच्या प्रभावामुळेच या ट्रस्टला जमीन मिळाली. सामान्य प्रक्रियेला बगल देत सत्तेचा वापर करून हा लाभ मिळवून देण्यात आला, असा भाजपचा दावा आहे.
भंडारी यांनी पुढे म्हटले की, हा केवळ एका जमिनीचा विषय नसून ट्रस्टशी संबंधित इतर जमीन व्यवहारांचाही तपास होणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशीही मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
राहुल गांधी-रॉबर्ट वाड्रा प्रकरणाशी तुलना
भाजपने या वादाची तुलना यापूर्वी काँग्रेसशी संबंधित जमीन व्यवहारांच्या आरोपांशी केली आहे. खरगे कुटुंबीयांनीही राजकीय प्रभावाचा वापर करून फायदा घेतल्याचा आरोप करत भाजपने काँग्रेसवर पुन्हा निशाणा साधला आहे.
प्रियांक खरगेंचा जोरदार पलटवार
या आरोपांनंतर प्रियांक खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून भाजपला प्रत्युत्तर दिले. त्यांनी भाजपवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) खूश करण्यासाठी मुद्दाम राजकीय वातावरण तापवण्याचा आरोप केला.
प्रियांक खरगे म्हणाले की, “लोक अयोध्येतील राम मंदिराच्या खर्चाचा हिशेब मागत आहेत, पण भाजप कलबुर्गीतील भगवान बुद्धांच्या नावाने राजकारण करण्यात व्यस्त आहे.”
‘चूक असेल तर मी तुरुंगात का नाही?’
प्रियांक खरगे यांनी भाजपच्या आरोपांवर प्रतिप्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “कर्नाटकमध्ये भाजपचे पाच मुख्यमंत्री झाले. केंद्रात मोदी सरकारला 12 वर्षे झाली. जर काही गैरव्यवहार झाला असेल तर माझ्यावर कारवाई का झाली नाही? मी आजही मोकळा फिरत आहे, तुरुंगात का नाही?”
तसेच संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असल्याचा दावा करत त्यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली.
राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. खरगे कुटुंबीयांवरील हे आरोप आणि त्यावरील प्रत्युत्तर यामुळे कर्नाटकासह राष्ट्रीय राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता या प्रकरणात न्यायालयीन किंवा चौकशी संस्थांची पुढील भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App