प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांचे राजकीय वैर टोकाला गेलेले असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले नाही, ही चूक झाली, अशी कबुली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यांनी आपल्याकडे दिली होती, असा दावा विक्रम गोखले यांनी केला आहे.Shiv Sena has not been given the post of Chief Minister; Fadnavis had given a wrong confession
विक्रम गोखले यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने हा दावा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंधाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कारण विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजपला एकत्र राहण्याचे मी प्रयत्न करतो आहे. त्यांना एकत्र येण्याची वेळ पर्यायच नाही असे वक्तव्य देखील केले आहे.
विक्रम गोखले यांच्या दाव्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची राजकीय विसंगती अधिक ठळक होऊ लागल्याने हे पक्ष फुटून शिवसेना परतीची वाट धरेल का?, असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्रात रझा अकादमीने काढलेले मोर्चे, अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड येथे झालेली दगडफेक या पार्श्वभूमीवर शिवसेनेने रझा अकादमीला दिलेली क्लीन चिट यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यातून तर विक्रम गोखले यांनी हे विधान केले नाही ना याची देखील चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
शिवसेना-भाजपची युती झाली नाही. त्याबाबत मी देवेंद्र फडणीसांना विचारणा केली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? असा सवाल मी त्यांना केला. त्यावर फडणवीसांनी चूक झाल्याचे सांगितले होते, असा खळबळजनक दावा विक्रम गोखले यांनी केला आहे. गोखले यांच्या या दाव्याने राजकीय तर्कवितर्कांनाही उधाण आले आहे.
पुण्यात एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना-भाजपला एकत्र आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वर्ष शिवसेनेला दिले असेल तर काय बिघडले असते?, असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा सवालही मी त्यांना केला होता. त्यावर चूक झाली असे फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा विक्रम गोखले यांनी केला आहे.
एकट्या फडणवीसांची चूक
खरं तर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. ती आता आपण भोगत आहोत, असं ते म्हणाले. मी तोंड दाबण्याने बांधून घेत नाही. त्यामुळेच मी कोणत्याही राजकीय पक्षांना बांधिल नाहीये. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश बिदेश झुगारुन देतो, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी आदर्श नायक
जे लोक पक्षाचं काम करतात त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही. पक्षाचं काम सगळेच करतात. पण मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. जाणीवपूर्वक आपआपली डोकी जागेवर ठेवून काम करा. पुन्हा एकदा माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता जे चाललं आहे त्यातून बाहेर पडून भाजप-शिवसेनेने एकत्र आले तर फार बरे होईल, असेही ते म्हणाले.
कंगनाच्या विधानाच समर्थन
यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रणावतच्या विधानाचं समर्थन केले. कंगना म्हणाली की, भीक मागून स्वातंत्र्य मिळाले. तिच्या म्हणण्यावर मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेले आहे बरं का. ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी वाचवले नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभे राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवले नाही. असेही लोक आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचले आहे मी, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App