विशेष प्रतिनिधी
जळगाव : कोरोनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मला ठाण्याला जाण्याची गरज नाही. उलटपक्षी गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल, अशा शब्दांमध्ये आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाजनांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. Girishbhau to be send in Pune’s Budhwar Peth, not me to Thane; Eknath Khadse dropped the level of criticism
कोरोनावरून खडसे आणि महाजन या दोन्ही बलाढ्य नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा आता पातळी सोडून घसरला आहे.
कालच नाथाभाऊंनी ”मोक्काच्या भितीने गिरीश महाजनांना कोरोना झाला का ?” असा प्रश्न केल्यानंतर आ. गिरीश महाजन यांनी त्यांना ठाण्याच्या ट्रिटमेंटची गरज असल्याची टीका केली होती. यावरून माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी ठाण्यावरून थेट बुधवार पेठेचाच दाखला दिल्याने दोन्ही नेत्यांमधील शब्दयुध्दाचा भडका उडाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more