लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील असा बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय २०२४ संकल्प यात्रेच्या’ निमित्तानं आतापर्यंत २१ लोकसभा मतदारसंघात प्रवास केला. या प्रवासात त्यांनी ३३ हजार ७१० नागरिकांशी थेट संवाद साधला आणि पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती द्याल? असा प्रश्न विचारला. त्यापैकी ३३ हजार ६९७ लोकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पसंती दिली आणि केवळ १३ लोकांनी इतर पक्षातील नेत्यांना पसंती दिली. त्यातील फक्त चौघे राहुल गांधी समर्थक होते. The people of Maharashtra prefer Narendra Modi for the post of Prime Minister Bawankule
याबाबत बावनकुळे यांनी ट्वीटद्वारे माहिती देताना सांगितले की, गेल्या साडेनऊ वर्षांत नरेंद्र मोदींनी केलेला विकास, जगभरात उंचावलेली भारताची मान, आत्मनिर्भर भारतासाठी केलेला संकल्प यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने मोदींच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील जनतेच्या याच प्रेमाच्या बळावर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील हा ठाम विश्वास आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’, हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र भाजपा कटिबद्ध आहे.
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या दोन महिन्यांत चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ – वाशीम, अकोला, बुलडाणा, अमरावती, रामटेक, नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक ,बारामती, मावळ,शिरूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, हातकणंगले, ठाणे, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात प्रवास करून जनतेशी थेट संवाद साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App