विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर ताबडतोब तेथे प्रशासक नेमण्यास महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने मंजुरी दिली आहे, तर दुसरीकडे त्याच सरकार मधले वरिष्ठ मंत्री अनिल परब यांनी मात्र शिवसेना मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवून 125 जागा जिंकेल, असा दावा केला आहे. Mumbai Municipal Corporation elections: On the one hand, the preparation to appoint an administrator; On the other hand, Shiv Sena claims to win 125 seats !!
मुंबई महापालिकेची मुदत 8 मार्च रोजी संपत आहे. त्यानंतर लगेच तेथे प्रशासक नेमण्याच्या हालचाली ठाकरे – पवार सरकारने चालविल्या आहेत. निवडणुका पुढे ढकलण्याचा हा डाव असल्याचा राजकीय वर्तुळात आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती ठरली असून 236 पैकी 150 प्रभाग जिंकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 125 प्रभाग निश्चित जिंकू, असा दावा केला आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे. परंतु अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे मुंबईत प्रशासक नेमून महापालिकेची निवडणूक पुढे ढकलून आपल्या सोयीनुसार घेण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री 125 जागा जिंकण्याचा दावा करून शिवसैनिकांना चार्ज करण्याचा प्रयत्न करताहेत. अशी दुहेरी रणनीती शिवसेनेने स्वीकारल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App