जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली. He did not say that there should be Mujra in the court of Nasheeb Maharaj; Atul Bhatkhalkar’s sharp criticism of Javed Akhtar
विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांनी या साहित्य संमेलनात हजेरी लावली आहे.दरम्यान जावेद अख्तर यांनी देखील नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात उपस्थिती नोंदवली होती. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, ” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात उर्दू शायरी व्हायची.”
तसेच जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली.दरम्यान जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात टीकास्त्र सोडले आहे.
पटकथाकार गीतकार @Javedakhtarjadu आता इतिहासकारांच्या भूमिकेत आलेत. महाराजांच्या दरबारात उर्दू शायरी व्हायची असे ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलले… 'मुजरा' व्हायचा असे म्हणाले नाहीत हे नशीब. ब्रिगेडी राज्यकर्त्यांच्या सत्तेत ब्रिगेडी इतिहासकारांचा सुळसुळाट झालाय. — Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) December 4, 2021
पटकथाकार गीतकार @Javedakhtarjadu आता इतिहासकारांच्या भूमिकेत आलेत. महाराजांच्या दरबारात उर्दू शायरी व्हायची असे ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलले… 'मुजरा' व्हायचा असे म्हणाले नाहीत हे नशीब. ब्रिगेडी राज्यकर्त्यांच्या सत्तेत ब्रिगेडी इतिहासकारांचा सुळसुळाट झालाय.
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) December 4, 2021
टीका करताना अतुल भातखळकर म्हणाले की , “पटकथाकार आणि गीतकार जावेद अख्तर हे आता इतिहासकारांच्या भूमिकेत आले आहेत. नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत.” ब्रिगेडी राजकर्त्यांच्या सत्तेत ब्रिगेडी इतिहासकारांचा सुळसुळाट झालाय, असा घणाघातही अतुल भातखळकर यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App