विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जनतेच्या हातात रोख पैसे सोपवा, विकासकामांवरील खर्च वाढवा आणि केंद्र व राज्य सरकारांमधील समन्वय आणखी वाढवा, असे सल्ले नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संवादामध्ये बॅनर्जी यांनी अनेक सूचना केल्या. विकासकामांवरील खर्च वाढविणे हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा सर्वांत सोपा आणि सरळ मार्ग असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. मागील भागांमध्ये राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डाॅ. रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती.
या संवादामध्ये बॅनर्जी यांनी मांडलेले मुद्दे…
जनतेच्या हातात रोख देण्याच्या बॅनर्जी यांच्या या सूचनेपूर्वीपासूनच केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटी रूपयांची पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये जॅमचा (जन धन, आधार आणि मोबाइल) आधारे पहिल्या टप्प्यात सुमारे ३३ हजार कोटी रूपये थेट गरीबांच्या बँक खात्यांमध्ये जमा केलेले आहेत. मे महिन्यांमधील रोख रक्कम हस्तांतरीत होत आहे. असे तीन महिने केंद्र सरकार ही रक्कम देणार आहे. त्यामध्ये जन धन खाते असलेल्यांना दरमहा पाचशे रूपये, विधवा- परितक्क्या-निराधार- दिव्यांगांना दोन हजार रूपये, बांधकाम मजुरांना एक हजार रूपये दिले जात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App