विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोविड १९ च्या प्रादूर्भावानंतरची परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगली हाताळत आहे, असा विश्वास देशातील ९३.५% जनतेने व्यक्त केला आहे.
आयएनएस – सी व्होटर ट्रँकरचा हा निष्कर्ष आहे. मोदी सरकार यशस्वीरित्या परिस्थिती हाताळत आहे, असा प्रश्न १६ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान ट्रँकरवर टाकण्यात आला होता. त्याला ९३% लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात या ट्रँकरची सुरवात केली होती.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ७६.८% जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला होता. त्यानंतर टप्प्या टप्प्याने मोदींवरील विश्वासाच्या टक्केवारीत भर पडत गेली. ३१ मार्चला ७९.३% तर १ एप्रिलला ८९.९% पर्यंत ही टक्केवारी वाढली. २१ एप्रिलला ही टक्केवारी ९३.५% वर पोहोचली.
“सत्य हे आरशासारखे लख्ख दिसते. त्याला दुसऱ्या पुराव्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची सगळे जग प्रशंसा करते आहे”, असे ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App