
Rahul Gandhi : देशातील कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्याचे म्हणत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. दरम्यान, त्यांनी नुकतेच ट्विट केले की, ‘जुलै आला आहे, लस कुठे आली?’ त्यांच्या या ट्विटवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिले आहे. Union Health Minister Harsh Vardhan Reply To Rahul Gandhi On His Vaccine Tweet
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्याचे म्हणत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. दरम्यान, त्यांनी नुकतेच ट्विट केले की, ‘जुलै आला आहे, लस कुठे आली?’ त्यांच्या या ट्विटवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले डॉ. हर्षवर्धन?
डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विट केले की, “कालच मी जुलै महिन्यासाठी लसींच्या उपलब्धतेबाबत तथ्य समोर ठेवले. राहुल गांधींजींची अडचण काय आहे? ते वाचत नाही का? त्यांना समजत नाही का? अहंकार आणि अज्ञानाच्या विषाणूवर कोणतीही लस नाही. नेतृत्वात बदल होण्याबाबत कॉंग्रेसने विचार करायला हवा.”
Just yesterday, I put out facts on vaccine availability for the month of July.
What is @RahulGandhi Ji’s problem ?Does he not read ?
Does he not understand ?There is no vaccine for the virus of arrogance and ignorance !!@INCIndia must think of a leadership overhaul ! https://t.co/jFX60jM15w
— Dr Harsh Vardhan (Modi Ka Pariwar) (@drharshvardhan) July 2, 2021
एवढेच नव्हे, तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्ला केला आहे. रिजिजू म्हणाले, “व्यापक लसीकरण मोहिमेला बदनाम करण्यासाठी अशी बेजबाबदार विधाने पाहून खूप वाईट वाटले. भारत सरकारने 75 टक्के लस विनामूल्य दिल्यानंतर, लसीकरणाची गती वाढली आणि जूनमध्ये 11.50 कोटी डोस देण्यात आले. कृपया या प्राणघातक महामारीच्या दरम्यान राजकारण करू नका.
तत्पूर्वी, 27 जून रोजी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची खिल्ली उडवत म्हटले होते की, “कामाची बात फक्त एक. लसीची कमतरता संपवा! बाकीचे सर्व लक्ष वळविण्याचे बहाणे आहेत.” दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “फक्त प्रत्येक देशवासीयापर्यंत लस पोहोचवा, मग भलेही मन की बात ऐकवा!”
झूठ बोलने के लिए उम्र पड़ी है,
नज़र उठाओ सामने सच्चाई खड़ी है… pic.twitter.com/rQJY0X7fxJ— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) July 2, 2021
देशातील लसीकरणाची स्थिती काय आहे?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाविरोधी लसीची 1.24 कोटींपेक्षा जास्त डोस अद्याप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे बाकी आहेत आणि येत्या तीन दिवसांत 96,66,420 डोस त्यांना पुरवले जतील. मंत्रालयाने म्हटले की, आतापर्यंत भारत सरकारकडून (विनामूल्य) आणि राज्यांच्या थेट खरेदीमधून 32.92 कोटी डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आले आहेत.
Union Health Minister Harsh Vardhan Reply To Rahul Gandhi On His Vaccine Tweet
महत्त्वाच्या बातम्या
- बॉलीवूडकडे ईडीचा मोर्चा, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अभिनेत्री यामी गौतमला समन्स, नुकतेच झाले होते लग्न
- ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदी विद्या बालन आणि एकता कपूरची वर्णी, अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मतदानाचा मिळाला अधिकार
- योगी सरकारने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राकेश टिकैत यांची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या कारण!
- काकाला अडकवण्यासाठी मुनव्वर राणांच्या मुलाने स्वत : वर झाडून घेतल्या गोळ्या, यूपी पोलिसांचा मोठा खुलासा
- माणुसकीला काळिमा : 15 हजारांसाठी तब्बल 75 दिवस कोविड रुग्णाचा मृतदेह फ्रीझरमध्ये, आता झाले अंत्यसंस्कार