जेडीयू आणि भाजपकडे पूर्ण बहुमत आहे
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये एनडीएचे सरकार बनताच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या सरकारबाबतही भाष्य केलं. पहिल्यांदाच तुम्ही अर्थसंकल्प मांडणार, त्यात काय लक्षात ठेवणार, असा सवाल माध्यमांकडून करण्यात आला. याला उत्तर देताना मुख्य भर गरीब कल्याणावर असेल, असे ते म्हणाले. Samrat Chaudhary made a big announcement to provide 94 lakh jobs in Bihar
गरिबांचे कल्याण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेही ध्येय असल्याचे ते म्हणाले. तेजस्वी यादव यांच्याकडे बोट दाखवत सम्राट चौधरी म्हणाले की, लोक म्हणत होते की १० लाख नोकऱ्या देऊ, पण आम्ही ९४ लाख लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नितीश कुमार I.N.D.I.A आघाडीतून बाहेर पडण्यास ‘जेडीयू’ने काँग्रेसला धरले जबाबदार
फ्लोअर टेस्टबद्दल बोलताना ते म्हणाले की जेडीयू आणि भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्याचवेळी जीतन राम मांझी यांच्या रुपाने तिसऱ्या पक्षाचाही पाठिंबा आहे. ते म्हणाले की, तीन पक्षांसह सभागृहात 128 आमदार आहेत, जर कोणी यामध्ये काही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीच विचार करा की ते त्यांचे आमदार हैदराबादच्या आसपास घेऊन जात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App