दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. टिकरी हद्दीतील 40 फुटी रस्ता खुला करण्यात आला आहे, मात्र मार्ग खुला केल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, शेतकरी बॉर्डर रिकामी करणार नाहीत. Barricades removed from Delhi’s borders, angry farmers sitting on the road opening 40 feet on Tikri border
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. टिकरी हद्दीतील 40 फुटी रस्ता खुला करण्यात आला आहे, मात्र मार्ग खुला केल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, शेतकरी बॉर्डर रिकामी करणार नाहीत.
प्रशासनाने टिकरी हद्दीवरील बॅरिकेड हटविण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी मोर्चा उघडला. 10 फुटांचा तातडीचा मार्ग उघडण्याचे बोलून पोलिसांनी 40 फूट उघडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे शेतकऱ्यांनी कधीच रास्ता रोको केला नसल्याचं म्हटले, पण प्रत्यक्षात मात्र पोलीस त्यांचे बॅरिकेड्स हटवत असल्यानं नाराजी व्यक्त होत आहे.
बागपत येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सीमा रिकामी करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या 11 महिन्यांपासून राजधानी दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमेवर लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. आता बॅरिकेड्स हटवल्यानंतरही सीमेवरील परिस्थिती सामान्य होईल, असे वाटत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App