Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, वादग्रस्त कृषी कायद्यांना पूर्णपणे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांना ज्याची अडचण वाटते त्या भागात सुधारणा करण्यात यावी. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचा एक गट केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करत आहे. Sharad Pawar Says Comment On Farm Laws and Maharashtra Government
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, वादग्रस्त कृषी कायद्यांना पूर्णपणे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांना ज्याची अडचण वाटते त्या भागात सुधारणा करण्यात यावी. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचा एक गट केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करत आहे.
शरद पवार यांना विचारण्यात आले की, शेतकर्यांची मागणी लक्षात घेता महाराष्ट्र सरकार केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ठराव आणणार आहे का? त्यास उत्तर देताना ते म्हणाले की, संपूर्ण कायदे नाकारण्याऐवजी ज्या भागाविषयी शेतकऱ्यांचा आक्षेप आहे, त्यात आपण बदल करू शकतो. ते म्हणाले की, या कायद्याशी संबंधित सर्व बाजूंचा विचार केल्यावरच ते विधानसभा पटलावर आणले जाईल. देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले की, हा कायदा करण्यापूर्वी राज्यांनी आपापल्या वादग्रस्त बाबींचा विचार केला पाहिजे, मगच निर्णय घ्यावा. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या दोन दिवसीय अधिवेशनात हे येईल असे मला वाटत नाही .आल्यास त्याचा विचार केला पाहिजे. दरम्यान, केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात मागील वर्षी 26 नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. गाझीपूर सीमा, सिंघू सीमा येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. शरद पवार म्हणाले की, मंत्र्यांचा एक गट या कायद्याचा विचार करत आहे. जर हा गट शेतकर्यांच्या बाजूने काही चांगले व आवश्यक बदल आणत असेल, तर या कृषी कायद्यांविरोधात ठराव आणण्याची गरज नाही.
Had a discussion with Balasaheb Thorat on this. As Centre has cleared the Bills, before passing these, States should discuss the contentious points & decide. I don't think it'll come up in the 2-day State Assembly session. If it comes, should be discussed: NCP chief on Farm Laws pic.twitter.com/h6hxeS12b1 — ANI (@ANI) July 1, 2021
Had a discussion with Balasaheb Thorat on this. As Centre has cleared the Bills, before passing these, States should discuss the contentious points & decide. I don't think it'll come up in the 2-day State Assembly session. If it comes, should be discussed: NCP chief on Farm Laws pic.twitter.com/h6hxeS12b1
— ANI (@ANI) July 1, 2021
केंद्राकडून कृषी कायद्यांचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारे शरद पवार पुन्हा म्हणाले की, हे लोक गेल्या 7 महिन्यांपासून निषेध करत आहेत. शेतकरी व केंद्र यांच्यात अडथळ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच हे लोक इथे बसले आहेत. केंद्राने या शेतकर्यांशी बोलले पाहिजे. खुद्द केंद्रानेच या प्रकरणात पुढाकार घ्यावा.
Sharad Pawar Says Comment On Farm Laws and Maharashtra Government
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App