छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, धर्माच्या रक्षणासाठी लोकांनी कट्टर हिंदू नेत्याला सरकारचे प्रमुख म्हणून निवडले पाहिजे, यानंतर कालीचरण महाराजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे. हे बाबा कोण आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जाणून घ्या, या वादग्रस्त महाराजांबद्दल… Kalicharan Maharaj Profile Know How 8th pass Abhijit Dhananjay Sarag becomes Kalicharan Maharaj, arrested for insulting Mahatma Gandhi
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे संत कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक करण्यात आली आहे. रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराजांना खजुराहो येथून पकडले आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, धर्माच्या रक्षणासाठी लोकांनी कट्टर हिंदू नेत्याला सरकारचे प्रमुख म्हणून निवडले पाहिजे, यानंतर कालीचरण महाराजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे. हे बाबा कोण आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जाणून घ्या, या वादग्रस्त महाराजांबद्दल…
कालीचरण महाराज हे अकोला शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी आहेत. एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव अभिजित धनंजय सराग आहे. ते भावसार समाजतून येतात. त्यांचे वडील धनंजय सराग यांचे जैन चौकात मेडिकलचे दुकान आहे.
कालीचरण ऊर्फ अभिजीत सरग यांनी शिवाजी नगर परिषद शाळेत इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण झाल्याचे स्थानिक सांगतात. अभ्यासात रस नसल्यामुळे आई-वडिलांनी कालीचरण यांना मावशीच्या घरी इंदूरला पाठवले. इथेच ते मराठीतून हिंदी बोलायला शिकले. याशिवाय संत भय्यूजी महाराजांच्या आश्रमात जाऊ लागले, त्यांना तेथील अध्यात्माची आवड निर्माण झाली. यानंतर अभिजीत सराग हे कालीचरण महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले. इंदूरमध्ये ते भय्यूजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखालीही आले होते. मात्र काही दिवसांनी ते भय्यूजी महाराजांचा आश्रम सोडून अकोल्यात परतले.
कालीचरण महाराज हे इंदूरहून 2017 मध्ये अकोल्यात परतले आणि महापालिका निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावले. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
अभिजीत सराग ते कालीचरण नाव होण्याची कथाही खूप रंजक आहे. कालीचरण यांनी दावा केला होता की, कालीमातेने त्यांना केवळ दर्शनच दिले नाही, तर अपघातातूनही वाचवले. याबाबत त्यांनी माध्यमांना सांगितले होते की, “अपघातात माझे पाय तुटले होते. माझे पाय 90 अंशांपेक्षा जास्त वाकले होते आणि दोन्ही हाडे तुटली होती. पण कालीमातेने मला दर्शन दिले आणि तिने माझा पाय पकडला आणि त्याच वेळी माझे पाय चांगले झाले. ते म्हणाले की, हा एक गंभीर अपघात होता, पण मला शस्त्रक्रिया करावी लागली नाही, मला माझ्या पायात रॉड लावावा लागला नाही. हे काही चमत्कारापेक्षा कमी नव्हते. मी काली माँचे दर्शन घेऊ शकलो आणि त्यानंतर मी मातेचा प्रखर भक्त झालो.”
कालीचरण महाराज सांगतात, “माझी आजी म्हणायची की मी रात्रीसुद्धा काली मातेचे नामस्मरण करत असे. मी काली माँची पूजा करू लागलो आणि माझी धर्मात आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून मी कालीमातेचा पुत्र झालो. दरम्यान, कालीचरण महाराज आपल्या गुरूचे नाव महर्षी अगस्त्य सांगतात. कालीचरण महाराजांचा दावा आहे की ते १५ वर्षांचे असताना महर्षी अगस्त्य यांना भेटले होते. ते म्हणतात की, महर्षी अगस्त्यांनी त्यांना लाल कपडे घालायला सांगितले होते.
काही काळापूर्वी कालीचरण महाराज यांनी कोरोना विषाणूबाबतही वादग्रस्त विधान केले होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही फसवणूक करणारी संस्था आहे आणि तिचे डॉक्टर आणि तज्ज्ञही फसवणूक करणारे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. लसीची विक्री वाढावी म्हणून जागतिक आरोग्य संघटना लस कंपन्यांशी संगनमत करून लोकांना धमकवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी दावाही केला होता की, मृत्यू झालेल्या कोविड रुग्णांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जात नाहीत, त्यांची किडनी आणि डोळे काढले जात असतील. दरम्यान, कालीचरण महाराज आपल्या आरोपांना आधार देणारा कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत.
कालीचरण महाराज हे त्यांच्या भारदस्त आवाजातील स्त्रोत्रांमुळे सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवाजातील विविध देवी-देवतांची स्तोत्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. इंटरनेटवरील फॅन फॉलोइंगबरोबरच त्यांचे अनेक भक्तही आहेत.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आयोजित धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला सलाम केला होता. यानंतर रविवारी रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (२) (वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा द्वेष निर्माण करणारी विधाने करणे) आणि २९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कालीचरण महाराज मध्य प्रदेशातील खजुराहोपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर धामजवळ भाड्याच्या घरात राहत होते. आज पहाटे ४ वाजता रायपूर पोलिसांनी त्यांना अटक केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपी कालीचरण यांना घेऊन रायपूरला पोहोचणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App