उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी आज विधिमंडळात एकत्रच प्रवेश केला, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी आज विधिमंडळात एकत्रच प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे. प्रवेशद्वारापासून फडणवीस आणि ठाकरे हे सोबत विधिमंडळात गेले, यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र विधिमंडळात सोबत जाताना या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य दिसत होते, यामुळे अनेकजण विविध तर्क लढवत आहेत. if we ever have a meeting behind closed doors, we will surely let you know Former Maharashtra CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Meet
उद्धव ठाकरे म्हणतात मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण…
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘’प्रत्येक भेट हेतूने होत नाही. विधानसभेत प्रवेश करताना माझा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद हा केवळ शुभेच्छांची देवाणघेवाण होता आणि फार काही नाही. असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. याशिवाय, ‘’पूर्वी (राजकीय) वातावरण अधिक मोकळे होते, आजकाल बंद दाराआड होणाऱ्या चर्चा अधिक फलदायी ठरतात असे म्हटलं जातं. त्यामुळे आमची कधी बंद दाराआड बैठक झाली तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू.’’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
In the past, the (political) atmosphere was more open, nowadays it is said that discussions held behind a closed doors are more fruitful. Therefore, if we ever have a meeting behind closed doors, we will surely let you know: Former Maharashtra CM Uddhav Thackeray — ANI (@ANI) March 23, 2023
In the past, the (political) atmosphere was more open, nowadays it is said that discussions held behind a closed doors are more fruitful. Therefore, if we ever have a meeting behind closed doors, we will surely let you know: Former Maharashtra CM Uddhav Thackeray
— ANI (@ANI) March 23, 2023
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात चलबिचल आहे, असं महाविकास आघाडीचं नेते म्हणतात, याबद्दल विचारलं असता मंत्री शंभूराज देसाईंनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं की, “आमच्या लोकांतील चालण्यात, बोलण्यात कुठं जाणवतं का? आम्ही नेहमीप्रमाणे अधिवेशनाचं आणि दिलेल्या विभागाचं काम करत आहे. चलबिचल आणि चिंता करण्याचं काम आमच्या पक्षात नाही. उलट सरकार पडेल म्हणून महाविकास आघाडी तारखावर तारखा देऊन थकली आहे. पण, अजूनही सरकार पडलं नाही. कारण, फडणवीस आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App