विशेष प्रतिनिधी
बीड : अतिवृष्टीच्या अनुदानासाठी बीड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता.अतिवृष्टी होऊन देखील बीड तालुक्यातील मांजरसुंबा महसूल मंडळातील तीस गाव अनुदानापासून वंचित ठेवण्यात आली आहेत.Farmers block Dhule-Solapur highway; Aggressive for overgrown grants of thirty villages
त्यामुळे या गावांचा अनुदानाच्या यादीत समावेश करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलीय. दरम्यान या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते सामील झाले होते. जवळपास अर्धा तास या महामार्गावरील वाहतुक रोखल्याने औरंगाबाद आणि अंबाजोगाईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
महसूल मंडळाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास हे आंदोलन थांबवण्यात आले असले तरी मागणी मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App