जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे.Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages
विशेष प्रतिनिधी
अहदनगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला होता .आता या ६१ गावांमध्ये आणखी ८ गावांना लॉकडाऊन जाहीर केला आहे.त्यामुळे लॉकडाऊन असलेल्या गावांची संख्या आता ६९ झाली आहे.
या आठ गावांमध्ये संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी आणि शेवगावमधील वडुले बु. या गावांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे. तर, पारनेरसह अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांनीही निर्बंधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App