ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा; राणे यांची मागणी

राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चीनी व्हायरसचा मुकाबला करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला नारळ देऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चीनी व्हायरसचा मुकाबला करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला नारळ देऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडे’ अशी अवस्था उध्दव ठाकरे यांची झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. राणे यांनी म्हटले आहे की, ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, त्यांच्यात क्षमता नाही. चीनी व्हायरसचा सामना करण्यास सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली.

यावेळी राणे म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्ण आणि मृत्यू वाढत आहेत. राज्यपालांनी याकडे गांभीर्याने पाहावे आणि महाराष्ट्रातील मृत्यू थांबवावेत. हजाराच्या जवळपास मृत्यू झाले हे पाहता हे सरकार अपयशी ठरले आहे. महापालिका आणि राज्य सरकारची हॉस्पिटल लष्कराच्या ताब्यात द्यावी, तरच परिस्थिती सुधारु शकते. लष्कराच्या ताब्यात केवळ रुग्णालये नव्हे तर राज्य का देऊ नये, असा प्रश्न राणे यांनी केला आहे.

हे सरकार उपाययोजना करू शकत नाही, प्राण वाचवू शकत नाही. या सरकारची चीनी व्हायरसचा सामना करण्याची क्षमता नाही, त्यामुळे यांना नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी राज्यपालांकडे केली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात