आसाममध्ये दोन प्रवासी बोटी एकमेकांना धडकल्या, ८४ प्रवाशांचा वाचविण्यात यश

वृत्तसंस्था

गुवाहाटी : ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील ८७ पैकी ८४ जणांचा बचाव करण्यात यश आले आहे. दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. आसाममधील जोरहाट जिल्ह्यात निमती घाटाजवळ हा अपघात सायंकाळी घडला. Two boats trashed in Asaam

‘माँ कमला’ ही खासगी बोट माजुली येथे जात होती. त्याचवेळी माजुलीहून येणाऱ्या ‘त्रिपकाई’ या सरकारी फेरीबोटीशी तिची निमती घाट येथे धडक बसली. धडकेनंतर ‘माँ कमला’ बोट पाण्यात उलटून बुडाली. बोटीवर १२० हून अधिक लोक होते.



शोधमोहिमेदरम्यान एका महिलेचा मृतदेह सापडला. ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर उलटलेल्या बोटीचे अवशेष एनडीआरएफच्या पाणबुड्यांना सापडले.

या बोटीचा तळ कापला गेलेला होता. पण बोटीत एकही प्रवासी आढळला नाही. जोरहाट आणि माजुली जिल्ह्यांमधील वेगवेवगळ्याप गावांतील रहिवासी असलेल्या ८४ जणांचा बचाव करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वव सरमा यांनी आज घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

Two boats trashed in Asaam

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात