वृत्तसंस्था
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या आणि कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना RTPCR अहवाल असणे बांधनकारक केले आहे. याबाबतची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. RTPCR report of those coming to Konkan for Ganeshotsav is required; Citizens who have taken two doses of the vaccine, however, are not bound
कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव लवकरच सुरू आहे. त्यासाठी चाकरमान्यांची गावाकडे तयारी सुरु आहे. कोरोनाचे सावट आणि संकट यामुळे अनेक जण गावाकडे जावे की न जावे, या चिंतेत पडले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नाही. मात्र ज्या नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या नाहीत. त्यांनी जिल्ह्यात प्रवेशापूर्वी ७२ तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगावा लागणार आहे. परंतु १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांच्या आरटीपीआर चाचणी अहवालाची गरज नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App