Mount Everest : वसईच्या 25 वर्षीय तरुणाने माऊंट एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तसेच वसई विरार शहर पालिकेचा झेंडा फडकवला आहे. तब्बल साठ दिवसाचा प्रवास करून हर्षवर्धन जोशी या तरुणाने शिखरावर चढण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. शिखर चढण्यासाठी त्यांनी गेल्या काही चार वर्षांपासून तयारी चालू केली होती तर शिखर चढत असताना त्यांना मध्येच काही हजारो किलोमीटर वर कोरेानाची देखील लागण झाली. काही दिवस त्यांना विलगीकरण करण्यात आले होते. परंतु त्यांनी शिखराचा प्रवास करण्या अगोदर त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे त्यांना जास्त त्रास न जाणवता कमी वेळेतच कोरोनावर मात केली. हर्षवर्धन जोशी हे आयटी इंजिनिअर असून ते अनेक कंपन्यांचा अम्बॅसेडर आहेत असे त्यांनी सांगितले आहे. सरावासाठी त्यांना अनेक ठिकाणी जावे लागत होते, तर विरार शहरातील सुप्रसिद्ध जीवदानी मंदिर तसेच तुंगारेश्वर डोंगराचा व समुद्रकिनारी जाऊन ते आपला सराव करत असत, असे त्यांनी बोलताना सांगितले. watch 25 year old Mumbai Youth Successfully climb on Mount Everest
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App