Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी सुनावल्यावर अजित पवारांनी दिले महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे मोदी- शहा यांना श्रेय

Radhakrishna Vikhe Patil, Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Radhakrishna Vikhe Patil  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, अशा शब्दांत त्यांना सुनावले होते.Radhakrishna Vikhe Patil

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. अजित पवार जनाची नाही तर मनाची तर ठेवा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून कारखान्याला जीवदान दिले त्यांचे कारखान्याच्या सभेत अभिनंदनाचे बॅनर फोटो तरी लावा, असे ते म्हणाले होते.Radhakrishna Vikhe Patil



यावर अजित पवार म्हणाले, विखे पाटलांचा गैरसमज झाला आहे, मी स्वतः कबूल करतो की इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोल मध्ये मिक्स करायला परवानगीचे बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळे कारखानदारीला चांगली मदत झाली, याचे सगळे श्रेय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. विखे पाटलांना काहातरी गैरसमज झाला आहे. मी त्यांच्यासोबत बोलेन.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री विखे पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला. मिटकरी म्हणाले, भाजपचे वरिष्ठ नेते आपली दखल घेतीलच, पण उगाच खेटे घेऊ नका #राधेकृष्ण, असा टोलाही मिटकरींनी लगावला होता.

After hearing from Radhakrishna Vikhe Patil, Ajit Pawar gave credit to Modi-Shah for saving sugar factories in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात