
कृषी कायदे मागे घेऊन मोदींनी पाकिस्तान, खलिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांवर मोठा प्रहार केला असल्याचं खासदार साक्षी महाराज म्हणाले.Sakshi Maharaj appreciates Modi’s decision; Said – Modi’s mind is big
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी कायदे रद्द केले आहेत.दिल्लीच्या सीमेवर वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आल्याची भावना काहीजण व्यक्त करत आहेत. कृषी कायदे मागे घेऊन मोदींनी पाकिस्तान, खलिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांवर मोठा प्रहार केला असल्याचं खासदार साक्षी महाराज म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, बिल तयार होतील, त्यात सुधारणा होतील आणि पुन्हा येतील. कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान जिंदाबाद, खलिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.मोदींचे मन मोठं आहे. त्यांनी देश आणि बिल यापैकी देशाची निवड केली अशा शब्दात साक्षी महाराज यांनी मोदींच्या निर्णय़ाचे कौतुक केले आहे.
#WATCH | BJP MP Sakshi Maharaj says, "Bills(Farm Laws)have got nothing to do with polls…For PM Modi, nation comes first. Bills come, they're repealed, they can come back, they can be re-drafted. I thank PM that he chose nation over Bill&dealt a blow to wrong intentions."(20.11) pic.twitter.com/IIs8QCp4ty
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 21, 2021
साक्षी महाराज म्हणाले की, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील. बिल तयार होतात, बिघडतात, पुन्हा बिल आणण्यासाठी वेळ लागत नाही. तसंच या कायदे मागे घेण्यानं निवडणुकीवर परिणाम होणार नाही.
Sakshi Maharaj appreciates Modi’s decision; Said – Modi’s mind is big
Array