काय राव अजितदादा…गाववाल्याकडून जरा नीट समजून तरी घ्यायचं


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस निर्यात करायला नको होती, असे मत सर्वसामान्य नागरिकाने व्यक्त केले तर ते समजण्यासारखं आहे. पण महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारदेखील जेव्हा जाहीरपणे म्हणतात की, लस निर्यात करायला नको होती तेव्हा ही बाब गंभीर असते. पण अजित पवारांचे हे विधान वावदूक असल्याचे त्यांच्याच गावातल्या आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले. “We have never exported vaccines at the cost of the people in India and remain committed to do everything we can in the support of the vaccination drive in the country,” clarified Serum Institute of India (SII) chief Adar Poonawalla on Tuesday.


वृत्तसंस्था

लंडन : “मला हे पुन्हा एकदा सांगितेलच पाहिजे की भारतीयांना बाजूला ठेवून आजवर कधीच आम्ही लसींची निर्यात केलेली नाही. देशातील लसीकरण मोहिम यशस्वी व्हावी यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत आणि राहू,” असा खुलासा सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी मंगळवारी (दि. 18) स्पष्ट केले.

अँस्ट्राझेनका या बहुराष्ट्रीय कंपनीने इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत केलेल्या संशोधनातून तयार झालेल्या कोरोनावरील लसीचे उत्पादन घेण्याचे हक्क सीरमने मिळवले. त्यानुसार त्याचे उत्पादनही सीरमने सुरु केले आहे. कोव्हिशिल्ड या नावाने सीरमची लस उपलब्ध आहे. मात्र ही लस मोठ्या प्रमाणात निर्यात केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला जातो. हा आरोप खोडून काढणारे स्पष्टीकरण आदर यांनी दिले आहे. त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात दोन-तीन महिन्यात लसीकरण मोहिम पूर्ण होणे केवळ अशक्य आहे.

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेली सीरम ही पुण्यात स्थापन झालेली कंपनी. पुण्यात या कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. कोरोनावरील कोव्हिशिल्ड या लसीचे उत्पादनही पुण्यातच सुरु आहे. अजित पवार देखील गेली तीन दशके पुण्याच्या राजकारणात, समाजकारणात आहेत. महत्त्वाचे म्हणजे ‘सीरम’ची स्थापना शरद पवार यांचे कॉलेज जीवनातील मित्र सायरस पूनावाला यांनी केली. स्थापन केली. शरद पवार आणि पूनावाला ‘फॅमिली फ्रेंड’ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांना लस निर्यातीबद्दल बेछूट विधान करण्यापूर्वी पूनावाला यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेता आली असती. पण तसे घडले नाही. अखेरीस सायरस यांचे पुत्र आदर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रामुळे अजितदादांच्या वक्तव्यातील हवा निघून गेली.

‘सीरम’ने म्हटले आहे की, अँस्ट्राझेनकाच्या कोविड-19 वरील लसीचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस इतर देशांना या लसीची निर्यात सुरु होईल. कोरोना लसीच्या उत्पादनाच्या बाबतीत सीरमचा समावेश सध्या जगातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान सीरम आणि भारत बायोटेक या दोन भारतीय कंपन्यांनी कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरु केल्याने जगातील अनेक देशांनी भारताकडे कोरोना लसीची मागणी केली होती. त्यानुसार भारताने आत्तापर्यंत 6.6 कोटी लसींची निर्यात केली. बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, अफ्रिकेतील अनेक देश तसेच दक्षिण अमेरिकेतील काही देशांना ही लस भारताने पाठवली.



‘सीरम’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाचा गोषवारा असा –

  • कोविड-19 चे संकट भारतासह संपूर्ण जगासाठी अत्यंत कठीण ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींच्या निर्यातीवरुन भारत सरकार आणि सीरमसह अन्य भारतीय लस उत्पादक कंपन्यांबाबत जोरदार चर्चा चालू आहे.
  • मात्र कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी काही बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील.
  • जानेवारी 2021 मध्ये आमच्याकडे लसीचा मोठा साठा होता. आपली लसीकरण मोहिम यशस्वीरित्या चालू झाली आणि कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या नीचांकी स्तरावर येऊन पोहोचली. त्या वेळी आरोग्य तज्ञांपासून बहुतेक सर्वांचाच असा समज झाला की भारताने कोरोनाची लाट थोपवण्यात यश मिळवले आहे.
  • त्याच दरम्यान जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना साथीची स्थिती गंभीर बनली होती आणि त्यांना आपल्या मदतीची तीव्र गरज होती. त्यामुळे आपल्या सरकारने शक्य त्या सर्व मार्गांनी अनेक देशांना मदतीचा हात दिला. भारत सरकारच्या या भावनेमुळे आपल्या देशालाही अन्य देशांनी तंत्रज्ञान देऊ केले, आरोग्य सुविधांचे साह्य केले. अडचणीच्या काळात भारताने इतर देशांना केलेल्या मदतीमुळेच भारतालाही आज चोहोबाजूने मदत मिळते आहे.
  • आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की कोरोनाची साथ ही भूगोलातल्या सीमांनी किंवा राजकीय अडथळ्यांनी थांबत नाही. जगातला प्रत्येक देश सुरक्षित झाल्याखेरीज आपणही सुरक्षित होऊ शकणार नाही. त्यामुळे कोरोनाला जागतिक पातळीवर थोपवणे प्रत्येकासाठीच महत्त्वाचे आहे. आमच्या कंपनीच्या जागतिक पातळीवरील करारानुसार आम्हाला जगातल्या इतर देशांनाही लसींचे वितरण करणे अनिवार्य आहे. कोरोना साथीचा शेवट होईपर्यंत आमच्या कंपनीला हे करावे लागणार आहे.
  • आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की भारत हा जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या दोन देशांपैकी एक असल्याच्या वस्तुस्थितीकडे लोकांचे लक्ष जात नाही. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशातली लसीकरण मोहिम दोन-तीन महिन्यात संपू शकत नाही. संपूर्ण भारताचे लसीकरण होण्यासाठी किमान 2-3 वर्षांचा कालावधी लागणार आहे.
  • सीरमने आत्तापर्यंत 20 कोटी डोस वितरीत केले आहेत. कोरोनावरील लसीच्या एकूण उत्पादनाबाबत पाहिले तर सीरमचा समावेश जगातल्या पहिल्या तीन कंपन्यांमध्ये आहे. उत्पादनवाढीसाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू असून उत्पादीत लस भारतालाच देण्यास आमचे प्राधान्य राहणार आहे. या वर्षाखेरपासून कोव्हॅक्स आणि अन्य देशांना आम्ही लस पुरवठा चालू करु.
  • आम्ही एक बाब अधोरेखीत करु इच्छितो की भारतीय लोकांच्या गरजांशी प्रतारणा करुन आम्ही आजवर कधीच लस निर्यात केलेली नाही. भारतातील लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आम्ही कटीबद्ध होतो आणि भविष्यातही राहू. या लसीकरण मोहिमेसाठी आम्ही शक्य ते सर्व काही करु.
  • भारत सरकारसोबत आम्ही अथक काम करत असून आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्याच्या काळात कोरोनावर मात करण्यासाठी आपण एकी दाखवून खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे.

We have never exported vaccines at the cost of the people in India and remain committed to do everything we can in the support of the vaccination drive in the country,” clarified Serum Institute of India (SII) chief Adar Poonawalla on Tuesday.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात