विशेष प्रतिनिधी
मुंबई : तब्बल दीड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा हालचालींना वेग आला आहे. १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. The school bell will ring Now from 17 August
कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. अनेक निर्बंध सरकारने शिथील केले आहेत. त्यामुळे जेथे जेथे अनुकूल परिस्थिती आहे तेथे शाळा सुरु करण्याचा आग्रह धरला जात असल्याने शिक्षण मंत्रालय आणि शिक्षक विभागाने हा निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. अर्थात महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर हा निर्णय घेऊन शाळा सुरु होण्याचा मार्ग काढतील, असे गायकवाड म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App