Online Classes : कोरोना संसर्गामुळे जवळपास 18 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये व्हर्च्युअल वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत एका अहवालाने या यंत्रणेचा पर्दाफाश केला आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतातील 60 टक्क्यांहून अधिक मुले इंटरनेटचा वापर करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत रिमोट ऑप्शन आणि पर्यायी शिक्षण पद्धतीवर चालणाऱ्या शाळांना मोठा फटका बसला आहे. Azim Premji Foundation Study Shows 60 Percent Children In India Are Not Able To Use Internet for Online Classes
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे जवळपास 18 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये व्हर्च्युअल वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत एका अहवालाने या यंत्रणेचा पर्दाफाश केला आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारतातील 60 टक्क्यांहून अधिक मुले इंटरनेटचा वापर करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत रिमोट ऑप्शन आणि पर्यायी शिक्षण पद्धतीवर चालणाऱ्या शाळांना मोठा फटका बसला आहे.
अझीम प्रेमजी फाउंडेशनने केलेल्या या अभ्यासातून असे समोर आले आहे की, ६० टक्के शाळकरी मुले केवळ इंटरनेट नसल्यामुळे व्हर्च्युअल शिक्षणाशी जोडू शकलेले नाहीत. आणखी एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, केवळ ग्रामीण भागातीलच नाही तर शहरी भागातही अर्ध्याहून अधिक पालकांनी शाळांमध्ये इंटरनेट सिग्नल आणि वेगाबद्दल तक्रार केली आहे. याशिवाय मोबाइल डेटावर होणारा अवाढव्य खर्चही त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, केवळ 20 टक्के मुले अशी आहेत, जी या महामारीच्या काळात पूर्णपणे ऑनलाइन क्लासेस घेऊ शकतात. यापैकी केवळ निम्मी मुले थेट वर्गात सामील होऊ शकतात.
अहवालात दावा करण्यात आला आहे की, इंटरनेटच्या समस्येमुळे सुमारे 38 टक्के मुलांनी शाळा सोडली. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, 38 टक्के पालकांनी सांगितले की ऑनलाइन वर्ग योग्य मार्ग नाही. यामध्ये ऑफलाइन क्लासमध्ये जसे घडते तसे मूल शिकत नाही, त्यांना समजत नाही.
Azim Premji Foundation Study Shows 60 Percent Children In India Are Not Able To Use Internet for Online Classes
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App