वृत्तसंस्था
गुवाहाटी : देशाचा सरकारी कारभार अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. देशातील नागरिकांची मोजणी करण्यासाठी करण्यात येणारी जनगणनासुद्धा आता डिजिटल पद्धतीने करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आगामी जनगणना ही ई-जनगणना असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. यामुळे जनगणना अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक होण्यास मदत होईल. तसेच सरकारी योजनांचा लाभ देताना देखील तो योग्य व्यक्तीपर्यंत अचूक पोहोचेल, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. Online census for the first time
गुवाहटीमधील अमीगाव येथे जनगणना केंद्राचे उद्घाटन करताना शहा यांनी ही घोषणा केली आहे. या ई-जनगणनेचे अनेक फायदे असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. ई-जनगणनेनुसार नोंदणी झाल्यामुळे व्यक्तीची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपोआपच त्याचे नाव मतदार यादीत जोडण्यात येणार आहे.तसेच व्यक्तीला आपले नाव आणि पत्ता बदलणे देखील सोपे होणार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.
ई जनगणनेचे फायदे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App