विशेष प्रतिनिधी
लखनौ / नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची रणधुमाळी योगी आदित्यनाथ विरुद्ध अखिलेशसिंह यादव यांच्याभोवती वेगाने केंद्रित होत असताना देशातल्या सर्वांत मोठ्या राज्याच्या चार वेळेला मुख्यमंत्री बनलेल्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती मात्र एकदम शांत शांत, गप्प गप्प आहेत… हे कोडे राजकीय वर्तुळाला कोड्यात टाकणारे आहे. पण त्याहीपलीकडे जाऊन लाखमोलाचा प्रश्न असा आहे, की मायावतींच्या या मौनाचा फायदा कोणाला होईल बरे?Why four time CM Mayamati remains silent & reclutant campaigner?
ज्यांच्याशिवाय यूपीचे राजकारण गेली अडीच-तीन दशके पूर्णच होऊ शकले नसते, अशा मायावती २०२२च्या विधानसभा रणधुमाळीमधून जवळपास अलिप्तच आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ एक आठवडा राहिला असेपर्यंत त्या पडद्याआडच राहिल्या. त्यांनी आपली पहिली सभा २ फेब्रुवारीला गाझियाबादमध्ये घेतली. मायावतींच्या या मौनाची कारणे आणि त्याचे परिणाम याबाबत तीव्र कुतुहल आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, मायावतींच्या या मौनाची प्रमुख तीन कारणे आहेत. एक म्हणजे, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात त्या चांगल्याच अडकल्यात आणि त्यामुळे भाजपला अंगावर घेण्यास त्या कचरत आहेत. दुसरे कारण, त्यांचे प्रकृती अस्वास्थ. २०१९मधील लोकसभा निवडणुकीत भलामोठा भोपळा मिळाल्यानंतर राजकीय रंगमंचावरून त्यांनी जवळपास एक्झिटच घेतली होती. जिव्हारी लागलेला पराभव, सत्तेत नसल्याने गेल्या दहा वर्षांत झालेले पक्षाचे खच्चीकरण आणि बिघडत चाललेले स्वास्थ अशी ती कारणे आहेत. गाझियाबाद सभेमधील त्यांची बाँडी लॅंग्वेज पाहिली, तर मूळच्या मायावतीची झलक त्यात दिसली नाही. अर्थात अजून बराच कालावधी शिल्लक आहे. त्यात त्या कशा पद्धतीने उतरतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
खरा प्रश्न आहे, तो मायावतींच्या मौनाचा फायदा कोणाला होईल? पाहू या काही समीकरणे :
https://youtu.be/SYfXrJ4_GZo
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App